इंदापूर : भारताचे संविधान हे जगाला आदर्श ठरेल असे संविधान असून ते घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने संविधानानुसार जगले पाहिजे. आपल्या संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान मूल्य दिलेले आहे. जात, धर्म, वंश ,भाषा, प्रदेश अशी सर्व विविधता असून देखील आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची किमया केवळ संविधानातच आहे. या संविधानाचे महत्त्व समाजातील प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगितले पाहिजे त्यासाठी संविधान घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे.असे प्रतिपादन डॉक्टर शिवाजी यांनी केले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व प्राचार्य जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व सायन्स महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान या विषयावर ते बोलत होते.

PM Narendra Modi and Rahul Gandhi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना जोरदार उत्तर, “आम्ही संविधान जगणारे लोक, खिशात संविधान घेऊन…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Rahul Solapurkar Shivaji Maharaj
“मिठाईचे पेटारे नव्हते, शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले”, मराठी अभिनेत्याच्या वक्तव्याने वादंग
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
maharshtra sadan
महाराष्ट्र सदनातील त्रुटी दूर होणे आवश्यक, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा; स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Prabowo Subianto and Narendra Modi
संचलनात संविधान केंद्रस्थानी; इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

यावेळी डॉ. प्रज्ञा लामतुरे म्हणाल्या की,’ प्रत्येक विद्यार्थ्याने संविधान वाचले पाहिजे ते समजून घेतले पाहिजे आणि ते आचरणात आणले पाहिजे. हीच  एक उत्कृष्ट आचारसंहिता आहे. आपल्या संविधानामध्ये लोकशाहीवादी, समतावादी, मानवतावादी, व्यक्तिवादी आणि सहभागीवादी अशी सर्व प्रकारची मूल्य अंतर्भूत आहेत. त्यामुळे आपले संविधान प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिमत्व विकासाची समान संधी देते.

डॉ.भिमाजी भोर, डॉ. भरत भुजबळ यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिगंबर बिरादार यांनी केले. प्रास्ताविकामध्ये डॉ.बिरादार  यांनी संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले प्रत्येक विद्यार्थ्याने संविधानवादी बनले पाहिजे. संविधान हा आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे. जगभरच्या लोकशाही व्यवस्था कोसळत असताना भारताची लोकशाही ही जगातली सर्वश्रेष्ठ व सर्वात मोठी लोकशाही म्हणून खंबीरपणे जगाचे नेतृत्व करीत आहे याचे गमक भारतीय संविधानात आहे.  डॉ. तानाजी कसबे, प्रा. श्याम सातार्ले , डॉ.महंमद मुलाणी यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोस्टरचे डॉ. सुरेंद्र शिरसट व डॉ. शीतल पवार यांनी परीक्षण केले. सूत्रसंचालन  प्रा. गणेश मोरे यांनी केले. आभार प्रा. नम्रता निंबाळकर यांनी मानले.राज्यशास्त्र विभागातील प्रा. गणेश मोरे, प्रा नामदेव पवार ,प्रा. नम्रता निंबाळकर यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.

Story img Loader