पुणे: पावसाळा सुरू झाल्यापासून राज्यभरात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यंदा २१ जुलैपर्यंत डेंग्यूचे २ हजार ७४२ रुग्ण सापडले असून, मागील वर्षी त्या तुलनेत त्यात एक हजारहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चिकुनगुनियाची रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे.

राज्यभरात जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. पावसाळा संपताना सप्टेंबर महिन्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढू लागतील, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २१ जुलैपर्यंत डेंग्यूचे २ हजार ७४२ रुग्ण आढळले. यावर्षी एकाही डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही. मागील वर्षी जुलैअखेरीस १ हजार ९८१ रुग्ण सापडले होते तर ६ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. याचबरोबर चिकुनगुनियाचे यंदा २१ जुलैपर्यंत ३२५ रुग्ण सापडले आहेत. मागील वर्षी जुलैअखेरीस ही संख्या ४९३ होती.

percentage of women in crime is increasing what are the reasons
गुन्हेगारीत महिलांचा टक्का वाढतोय, काय आहेत कारणे?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
cyclonic air condition developed over North Maharashtra forming low pressure belt to North Bangladesh
पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
vasai rain marathi news
वसईतही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, सखल भाग पाण्याखाली; नागरिकांचे हाल
monkeypox case confirmed in kerala
Monkeypox : केरळमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण; गेल्या आठवड्यात यूएईवरून भारतात झाला होता दाखल
ST Corporation in profit after nine years
नऊ वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात

हेही वाचा… Rain Weather Update : ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कसा असेल? हवामान विभाग काय म्हणतो जाणून घ्या…

या वर्षी २१ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात डेंग्यूचे ४३ आणि महापालिकेच्या हद्दीत ३३ रुग्ण सापडले आहेत. राज्यात बृहन्मुंबई महापालिकेत सर्वाधिक ९७३ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल नाशिक महापालिका १३९, सांगली महापालिका १००, सोलापूर महापालिका ५८, कोल्हापूर महापालिका ५८, नागपूर महापालिका ५२, ठाणे महापालिका ४७, औरंगाबाद महापालिका ४१, कल्याण महापालिका २० अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात डेंग्यूची रुग्णसंख्या पालघर जिल्ह्यात सर्वाधिक १९१ आहे. त्याखालोखाल कोल्हापूर १६५, सोलापूर ५५, रत्नागिरी ५१, नांदेड ५१ आणि अहमदनगर जिल्ह्यात ४३ अशी आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा साथरोगांचा असतो. या काळात साथरोगांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. याचबरोबर जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. – डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य सेवा