Maharashtra Board 12th Result Live Updates : पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकाला निकालानुसार यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांन अधिक आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
MPSC answer key announced News regarding preliminary exam 2024 nagpur news
‘एमपीएससी’: उत्तरतालिका जाहीर; पूर्व परीक्षा २०२४ संदर्भात महत्त्वाची बातमी…
MPSC Results of over 15000 students delayed |
‘एमपीएससी’: ‘या’ पंधरा हजारांवर विद्यार्थ्यांचा निकाल रखडला..काय आहे कारण?
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क आणि संसाधन : अद्यायावत मुद्दे

परीक्षा चांगल्या वातावरणात पार पडली होती. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना वेळ मिळण्यासाठी वेळापत्रकात एका दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता. ३८३ समुपदेशकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले. कॉपी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्यात २७१ भरारी पथके कार्यरत होती, असे गोसावी यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांचा निकाल

२०१८ – ८८.४१ टक्के

२०१९ – ८५.८८ टक्के

२०२० – ९०.६६ टक्के

२०२१ – ९९.६३ टक्के

२०२२ – ९४.२२ टक्के

शाखानिहाय निकाल

कला – ८४.०५ टक्के

विज्ञान – ९६.९ टक्के

वाणिज्य – ९०.४२ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम – ९१.२५ टक्के

विभागीय मंडळनिहाय निकाल

पुणे : ९३.३४ टक्के

नागपूर – ९०.३५ टक्के

औरंगाबाद – ९१.८५ टक्के

मुंबई – ८८.१३ टक्के

कोल्हापूर – ९३.२८ टक्के

अमरावती – ९२.७५ टक्के

नाशिक – ९१.६६ टक्के

लातूर – ९०.३७ टक्के

कोकण – ९६.१ टक्के

पेपरफुटी किंवा तत्सम प्रकरणात ११ गुन्हे दाखल झाले.

डमी विद्यार्थी -१

कॉपी करणारे विद्यार्थी – ३४५

एकूण गैरप्रकार – १ हजारहून अधिक

१ लाख ३१ हजार ५६१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण

१ लाख ७६ हजार ७६३ विद्यार्थ्यांना ३५ टक्के ते ४५ टक्के गुण

Story img Loader