‘हर हर महादेव’ आणि येत्या काही काही दिवसांत प्रदर्शित होणारा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर यांनी गुरुवारी केली.

हेही वाचा >>>पुणे: वाहतूक कोंडीला वाहनांची संख्या जबाबदार; वाहतूक तज्ज्ञांचा दावा

mns protest against pakistani actor film the legend of maula jatt in nashik
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
The movie Ghaat will be released on September 27
‘घात’ चित्रपटाचे २७ सप्टेंबरला प्रदर्शन
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी वांढेकर यांनीही मागणी केली. इतिहास परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र कंक, विधी सल्लागार ॲड. मयूर सहाने, शहर सरचिटणीस मयूर गुजर, महासंपर्क प्रमुख संजय पासलकर, महेश बांदल, निवृत्ती कृष्णा धुमाळ या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>शिर्डी अधिवेशन अर्ध्यात सोडून अजित पवार नेमकं कुठे गेले होते? त्यांनीच स्वत: केला खुलासा, म्हणाले “माझ्याशिवाय यांचं…”

ऐतिहासिक संदर्भ नसतानाही काल्पनिक पात्र तयार करून या चित्रपटांत प्रेक्षकांची दिशाभूल करण्यात येत आहे. खोटा इतिहास दाखवून व्यक्तिमत्त्वांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक मान्यवरांचे, शिवप्रेमी योद्ध्यांचे वंशज, मराठा समाज यांची नाहक बदनामी झाल्यामुळे समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात यावे, असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.