लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यात उसाच्या गाळप हंगामाने गती घेतली असली तरीही मागील वर्षाच्या तुलनेत हंगामातील गाळप आणि साखर उत्पादन कमी आहे. २५ डिसेंबरअखेर राज्यात ३३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच काळात ४१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा साखर उत्पादनात राज्य आठ लाख टनांनी कमी झाले आहे.

onion export duty marathi news
विश्लेषण: कांदा निर्यातीवरील शुल्क कमी होऊनही उत्पादक नाराज का?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
icici prudential value discovery fund
आयसीआयसीआय प्रु. व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाची द्विदशकपूर्ती; गुंतवणुकीवर ‘निफ्टी’च्या तुलनेत दुप्पट लाभ
india s industrial production growth reached to 4 8 percent in july 2024
खाणकाम, निर्मिती क्षेत्रात मरगळ कायम; औद्योगिक उत्पादनाचा वेग जुलैमध्ये मंदावला
Ganesha, rain, rain forecast, rain maharashtra,
पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
World Bank forecast of 7 percent growth rate print eco news
विकास दराबाबत जागतिक बँकेचे ७ टक्क्यांचे भाकीत; कृषी, ग्रामीण क्षेत्राला उभारी पाहता अंदाजात वाढ
Growth in major sectors of india marathi news
देशातील प्रमुख क्षेत्रांतील वाढ जुलैमध्ये ६.१ टक्क्यांवर मर्यादित

यंदा राज्यात १९४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. या कारखान्यांनी ३७७ लाख टन उसाचे गाळप करून सरासरी ८.७६ टक्के साखर उताऱ्याने ३३ लाख टन साखर उत्पादन केले आहे. मागील वर्षी याच काळात २०१ कारखान्यांनी ९.२७ टक्के साखर उताऱ्याने ४५ लाख टन उसाचे गाळप करून ४१ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. यंदा गाळप हंगाम तब्बल महिनाभर उशिराने सुरू झाला. ऊसदाराच्या आंदोलनामुळे कोल्हापूर, पुणे विभागात कारखाने बंद राहिले. त्यानंतर गाळपाने वेग घेतला असला तरीही राज्यातील साखर कारखान्यांना अद्यापही पुरेसा ऊस मिळत नाही. अपेक्षित उताराही मिळत नाही. आता थंडी वाढल्यामुळे साखर उताऱ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा निर्णय लांबणीवर

दरम्यान, कोल्हापूर विभागाने ७.७, पुणे विभागाने ७.९, सोलापूर विभागाने ६.५, नगर विभागाने ४.१, छत्रपती संभाजीनगर विभागाने २.६, नांदेड विभागाने ३.७ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. सोलापूर विभागात यंदा सर्वाधिक ४७ कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी ८१ लाख टन उसाचे गाळप करून ६.५ लाख टन साखर उत्पादीत केली आहे. साखर उतारा सरासरी ८.०३ टक्के राहिला आहे.

किमान एफआरपी देण्याचे आदेश

गाळप हंगाम २०२३-२४चा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत सुरुवातीला गाळप झालेल्या उसाला किमान रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) द्यावा, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. पुणे आण नाशिक महसूल विभागातील कारखान्यांनी १०.२५ टक्के साखर उतारा गृहीत धरून प्रति टन ३०१५ रुपये आणि छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागातील कारखान्यांनी ९.५० टक्के साखर उतारा गृहीत धरून प्रति टन २०९१ रुपये द्यावेत, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. अंतिम साखर उतारा निश्चित झाल्यावर उर्वरीत रक्कम अदा करावी, असेही सरकारने शासन आदेशात म्हटले आहे.

आणखी वाचा-पुणे : मतदार नोंदणी करायला गेले अन्…

नऊ लाख टन क्षमतेने गाळप

पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पडलेला पाऊस आणि थंडीत झालेली वाढ यामुळे चांगला साखर उतारा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात गाळप वेगाने सुरू असून, सरासरी दैंनदिन नऊ लाख टनांनी गाळप सुरू आहे, असे राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी म्हटले आहे.