पुणे : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज ट्विट केलं. त्या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. त्याबाबत पुण्यात एका कार्यक्रमासाठी सुषमा अंधारे आल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, देवेंद्रजी आणि टीम भाजपा इतरांना कायम तुच्छ लेखत कोणाला तरी किंचित सेना म्हणायचं, कोणाला तरी शिल्लक सेना म्हणायचं, कोणाला तरी पप्पू म्हणायचं आणि सतत एक दर्पोक्ती करित रहायची. त्यामुळे अशी दर्पोक्ती करणारी माणस दुसऱ्यासाठी खड्डा खोदण्यात व्यस्त होतात. तेव्हा नागपूरमध्ये किती मोठा खड्डा खोदला जात आहे. याकडे दुर्लक्ष होतं, त्याच आशयाचे ट्विट होत असल्याचं सांगत भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली.

हेही वाचा >>> “अजित पवारांवर अनेक वेळा अन्याय पण त्यांना तो…” चंद्रकांत पाटलांचं विधान

News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

तर भाजपाच्या आसुरी सत्ताकांक्षेला रोखता येऊ शकते

आताच्या निवडणुकीत आम्ही आमची जागा राखली चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात त्या प्रश्नावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘गिरे तो भी नाक पर’ अस म्हणणं काही लोकांना लागु होत असेल हा निकाल अंत्यत ऊर्जादायि आणि सकारात्मक आहे. तसेच हा निकाल एक संदेश देणारा आहे. भाजपाची किती ही आसुरी सत्ताकांक्षा असली आणि महाविकास आघाडीने एकमेकांची साथ देऊन लढायच ठरविले. तर भाजपाच्या आसुरी सत्ताकांक्षेला रोखता येऊ शकते. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

Story img Loader