उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात घट होऊन सर्वत्र थंडी अवतरली आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सध्या तापमानात किंचित वाढ झाली असली, पश्चिमी चक्रवातामुळे पाकिस्तानपासून वारे वाहून काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टीची शक्यता आहे. त्यातून पुढील दोन-तीन दिवसांनंतर तापमानाचा पारा पुन्हा झपाट्याने घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे संक्रांतीच्या कालावधीत थंडी आणखी वाढू शकेल.

हेही वाचा- निजामाबाद-पुणे, दौंड-भुसावळ रेल्वे गाड्या उद्यापासून रद्द; पुणे-नागपूर गाड्या बदललेल्या मार्गाने

maharashtra recorded 33 to 35 degrees celsius maximumtemperature
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा; जाणून घ्या, कमाल तापमान का वाढले
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
weather department predicts rising temperatures in Mumbai with increased afternoon heat expected
मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता
nisargalipi A sign of arrival of spring season
निसर्गलिपी : वसंतागमनाची चाहूल
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!

सध्या उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट कायम असल्याने या भागात थंडीचा कडाका आहे. कोकणातही अनेक भागांत तापमानात घट होत असल्याने गारवा निर्माण झाला आहे. हिमालयीन विभागात होणारी बर्फवृष्टी आणि त्यामुळे उत्तरेकडील राज्यांतून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्याच्या तापमानात मोठी घट झाली. दोन दिवसांपासून तापमान झपाट्याने खाली गेले. ९ आणि १० जानेवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती होती. गोंदिया, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी भागांत ५ ते ६ अंश हंगामातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ५ ते ७ अंशांनी घटले होते. त्यामुळे कडाक्याची थंडी निर्माण झाली. सध्या उत्तरेकडील थंडीच्या लाटेची तीव्रता घटली आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी गारठा कायम आहे.

हेही वाचा- दहावी-बारावी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसहभागातून कृती कार्यक्रम, राज्य मंडळातर्फे पहिल्यांदाच उपक्रम

सध्या राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती आहे. त्याचप्रमाणे आकाशही निरभ्र आहे. त्यामुळे थंडीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कोकण विभागातील तापमानातही घट होत आहे. उत्तरेकडे नव्याने पश्चिमी चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. पाकिस्तानपासून चक्रीय वारे तयार झाले आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरसह हिमालयीन विभागात ११ ते १३ जानेवारी या कालावधीत पुन्हा बर्फवृष्टी जोर धरण्याची शक्यता आहे. परिणामी उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव पुन्हा वाढून महाराष्ट्रातील तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढेल.

Story img Loader