पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे राज्यभरात किमान तापमानात सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

मागील आठवड्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहे आणि दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. या सर्वांचा परिणाम राज्यात ढगाळ वातावरण आहे. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Weather experts predict the possibility of return of rain across the state pune news
बुधवारपासून राज्यभरात परतीचा पाऊस ? जाणून घ्या, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
chikungunya cases surge three times more in maharashtra
विश्लेषण : राज्यात यंदा चिकुनगुनियाचे रुग्ण तिपटीने का वाढले?
imd predict after above average rainfall severe cold weather in maharashtra
जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका
rain Maharashtra, monsoon Maharashtra,
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात किती पाऊस पडला ? जाणून घ्या, सर्वात कमी, सर्वात जास्त पाऊस कुठे झाला
sea level rising reason (1)
समुद्राची पातळी वेगानं वाढण्याची कारणं काय? जगातील कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?
Chance of rain again for rain in Maharashtra state Nagpur
राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण! येत्या २४ तासात…

हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शाळांमध्ये ‘स्कूल वेलनेस टीम’; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून ‘उम्मीद’ मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

सोमवारी राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. सोमवारी जळगावात ११, नाशिक १५.१, पुणे १५.२, कोल्हापूर २१.६, महाबळेश्वरात १७.१ आणि सोलापुरात १८.५ अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भातही किमान तापमानात वाढ झाली आहे. अकोल्यात १७, अमरावती १६.३, नागपूर १७.२ आणि यवतमाळमध्ये १५.५ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये १३.६, नांदेड १७.६ आणि परभणी १६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा – मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सतर्कतेचे आदेश; लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाजवळ बंदोबस्त

सातांक्रुझमध्ये ३६.८ अंश सेल्सिअसची नोंद

सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सांताक्रुझमध्ये झाली. सांताक्रुझमध्ये ३६.८, अलिबागमध्ये ३४.८, रत्नागिरीत ३६.३ आणि डहाणूत ३५.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. किमान तापमानही सरासरी २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले.