पुणे : राज्यातील सुमारे दहा हजार एकरावरील द्राक्षबागा अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, दर आणि मागणीअभावी द्राक्षे काढणीच्या प्रतीक्षेत आहेत. द्राक्षांबरोबर बेदाणा- निर्मितीलाही फटका बसला आहे.राज्यात सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, उस्मानाबाद जिल्ह्यांत द्राक्षांखालील क्षेत्र साडेतीन लाख एकरच्या घरात आहे. आजघडीला राज्यभरातील सुमारे दहा हजार एकरावरील द्राक्षबागांमध्ये द्राक्षे आहेत. काढणीला आलेल्या या द्राक्षबागा अखेरच्या टप्प्यात अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. सोलापूर परिसरात सर्वाधिक सहा हजार एकर, तर पुणे, सांगली, उस्मानाबाद आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी हजार एकरवरील द्राक्षबागांमध्ये अद्यापही द्राक्षे आहेत.

बेदाणा काळवंडला

सांगलीच्या पूर्व भागात बेदाणा उद्योगाचा चांगला विकास झाला आहे. यंदा सुमारे दोन लाख टन बेदाणानिर्मितीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बेदाणानिर्मिती वेगाने सुरू असतानाच अवकाळी पाऊस कोसळला. तासगाव पूर्व भागात सलग चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे बेदाणा काळा पडत आहे. अपेक्षित रंग येत नसल्यामुळे अधिक खर्च करून गंधकाची धुरी द्यावी लागत आहे. साखर भरलेल्या द्राक्षांवर पाऊस झाल्यामुळे गोडी कमी होत आहे. उतारा कमी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

On the occasion of Dussehra more than three and a half thousand vehicles have been registered in the transport department vasai news
दसऱ्याच्या निमित्ताने वाहन खरेदी जोरात; परिवहन विभागात साडेतीन हजाराहून अधिक वाहनांची नोंदणी ; ११ कोटी ९४ लाखांचा महसूल
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
tigers existence in sahyadri belt
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात आठ वाघांचे अस्तित्व
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
Bhira, Navi Mumbai corporation, Bhira project,
नवी मुंबई : भिरा प्रकल्पाच्या पाण्यावर पालिकेचा दावा
rain Maharashtra, monsoon Maharashtra,
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात किती पाऊस पडला ? जाणून घ्या, सर्वात कमी, सर्वात जास्त पाऊस कुठे झाला
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..

काय घडले?

निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळत होता. नाशिक, नारायणगाव, बोरी, तासगाव, सोलापूर परिसरातून चांगली निर्यात सुरू झाली होती. पण, हंगाम जोमात असतानाच अवकाळीने घात केला. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षे ३० ते ४० रुपये दराने देशांतर्गत बाजारात विकावी लागली. सुपर सोनाका, अनुष्का जातीच्या द्राक्षांना प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांपर्यंत दर मिळत होता, पण अवकाळीमुळे आता २० रुपये इतकाही दर मिळणे मुश्कील झाले आहे.

द्राक्षांचे दर पडले आहेत. बाजारातून मागणीही कमी आहे. अवकाळीमुळे द्राक्षघड कुजू लागले आहेत. अखेरच्या टप्प्यातील निर्यातक्षम द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. बेदाणा- निर्मितीवरही परिणाम होत आहे. – शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ