आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा सोहळा संपन्न झाला. सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. निर्बंधमुक्त सोहळा पार पडत असल्याने आळंदीत लाखो भाविक आल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. अंदाजे चार लाखांहून अधिक वारकरी आळंदीत आले असल्याचं सांगण्यात येत आहे. इंद्रायणी घाट वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला आहे.

हेही वाचा- देशभरातील संशोधकांना संशोधनपत्रिकांची मुक्त उपलब्धता; ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ योजनेची १ एप्रिलपासून अंमलबजावणी

Pune Municipal Corporation is losing revenue due to income tax defaulters worth crores of rupees Pune print news
बड्यांची थकबाकी, सामान्यांना भुर्दंड, नक्की काय आहे प्रकार! कोट्यवधींचा कर थकल्याचा मूलभूत सुविधानिर्मितीला फटका
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
Rajput Gardens
मुघल गार्डन्सची जितकी चर्चा होते, तितकी ‘राजपूत गार्डन्स’ची का होत नाही?
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई

ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात अवघी आळंदी दुमदुमून निघाली आहे. करोनाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर पहिल्यांदाच माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा निर्बंधमुक्त पार पडला. गेल्या पाच दिवसांपासून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. ज्ञानोबा माऊली, तुकोबांच्या गजरात अनेक दिंड्या आळंदीत दाखल झाल्या. समाधी सोहळ्याची सुरुवात किर्तनाने झाली. सव्वा बाराच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला, अशी माहिती देवस्थान चे विश्वस्त विकास ढगे यांनी दिली आहे. 

हेही वाचा- पुणे: घड्याळी तासिका शिक्षकांची सोळा वर्षांनी मानधनवाढ; माध्यमिकच्या शिक्षकांसाठी १२० रुपये, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी १५० रुपये

शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे, शेतकऱ्यांची भरभराट होऊ दे असे साकडे माऊली चरणी आळंदीत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी घातले आहे. अवघ्या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी हाच खरा वारकरी असून त्याची शेती सुजलाम सुफलाम होवो अशी अपेक्षा देखील वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुपार नंतर वारकरी परतीच्या मार्गाला लागतील. खर तर आजचा माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा हा वारकाऱ्यांमध्ये नवचेतना आणणारा आहे. या सोहळ्यामुळे अनेक वारकऱ्यांना स्फुर्ती मिळते. 

Story img Loader