पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चाळीसपेक्षा जास्त जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात चीड आणि संताप आहे. यानंतर देशात काश्मिरी तरूणांवर हल्ले होत आहेत. हे हल्ले भाजपाप्रणित आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या, बदला घ्या अशीच देशवासीयांची भावना आहे. अशात काश्मिरी तरूणांवर हल्ले होत आहेत. ही बाब दुर्दैवी असून पाकिस्तानला आपल्या देशात जी दुही माजवायची आहे तो त्यांचा उद्देश सफल होतो आहे असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्याचा इशारा दिला आहे. मात्र हा अधिकार त्यांना नाही असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गडकरींवर आणि मोदींवर टीका केली आहे. पुणे आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पार पडल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ही टीका केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा