पुणे : यंदा मोसमी पावसाचा अंदाज पाहता धरणातील पाणीबचत करणे आवश्यक आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा प्रस्ताव महापालिकेकडून सादर करण्यात आला होता. मात्र, शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढच्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. परिणामी पाणी वितरणातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महानगरपालिकेने आठ दिवसांत उपाययोजना सादर कराव्यात. तोवर शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही, असा निर्णय बुधवारी घेण्यात आला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Sanjay Dina-Patil, disqualification,
संजय दीना-पाटील यांच्या खासदारकीला आव्हान, शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्याने अपात्र ठरवण्याची मागणी
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Ajit Pawar private secretary, Supriya Sule,
बारामतीत शासकीय कार्यक्रमात अजित पवारांंचा खासगी सचिव व्यासपीठावर?; राजशिष्टाचारात बदल केले का? सुप्रिया सुळेंचा सवाल
Ajit Pawar, Ajit Pawar Ganapati Darshan Pune,
पुण्यात अजित पवारांसमोरच वाजली तुतारी…
ed file case against four people including executive chairman of religare
ईडीच्या तक्रारीवरून ‘रेलिगेअर’च्या कार्यकारी अध्यक्षांसह चौघांविरोधात गुन्हा, बर्मन कुटुंबाविरोधात खोटी माहिती दिल्याचा आरोप
vasai lawyer association protest
वसई: वकील संघटनांचे आंदोलन स्थगित; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन
Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis, BJP, Congress, Anil Wadpalliwar, High Court, women s schemes, election strategy, Eknath Shinde, Nana Patole, Maharashtra politics,
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीच्या निशाण्यावर आलेले वडपल्लीवार आहेत तरी कोण ?
The Kalyan Court rejected the bail application of Shiv Sena Vaman Mhatre badlapur
बदलापूर: वामन म्हात्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला

हेही वाचा… “अकबर हिंदू होता, ताजमहाल बांधणाऱ्याची आई…”, भालचंद्र नेमाडेंचं मोठं विधान

हवामान विभागाचा यंदाचा अंदाज पाहता पाणीटंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. धरणातील उपलब्ध पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे. शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. मात्र, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी बैठकीत केली. त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करावे. तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… पिंपरी : साखरपुड्यानंतर तरुणीवर अत्याचार, पाच लाखांची फसवणूक आणि लग्नास नकार

दरम्यान, खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्यातून ग्रामीण भागासाठी दुसरे उन्हाळी आवर्तन १ मेपासून सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार धरणांत ११.६१ अब्ज घनफूट ( टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यानुसार दुसऱ्या उन्हाळी आवर्तनात साडेचार ते पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, तर शहरासाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.