पुणे : ‘विविधतेतील एकात्मकते’चे दर्शन घडवून मंजुश्री ओक यांनी भारतातील तब्बल १२१ भाषा, बोलीभाषा आणि उपभाषांमध्ये सलग साडेतेरा तास १२१ गाण्यांचे सादरीकरण केलेल्या विक्रमाची ‘ गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे.  या विक्रमासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे १० ऑक्टोबर, २०१९ रोजी झालेल्या ‘अमृतवाणी-अनेकता मैं एकता’ या कार्यक्रमात ही गीते सादर केली होती. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांच्याकडून हा विक्रम पूर्ण झाल्याचे त्यांना नुकतेच कळविण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेची चंद्रकांत पाटील यांनी घेतली अखेर दखल; म्हणाले ‘पुणेकर आणि नाट्यकलावंतांच्या सूचना…’

Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Lakhat Ek Amcha Dada actors dance video
Video : झापुक झुपूक…! ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा जबरदस्त डान्स; सर्वत्र होतंय कौतुक
sangeet Manapaman Krishnaji Prabhakar Khadilkar Drama play entertainment news
१८ गायकगायिकांच्या १४ गाण्यांनी सजलेला ‘संगीत मानापमान’
England reach 500000 Test runs first team to achieve landmark
England World Record: ५ लाख धावा! इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, कसोटीच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
Oxford University picks brain rot as word of the year
अग्रलेख : भाषेची तहान…

यापूर्वी ओक यांनी २०१७ आणि २०१८ अशी सलग दोन वर्षे ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्डस्’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये प्रत्येकी दोन विक्रम नोंदविले आहेत. ओक म्हणाल्या, शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना आपल्या संगीत क्षेत्रातील प्रयत्नांद्वारे देशासाठी काहीतरी योगदान द्यावे, हा विचार मनात होता. याच दृष्टीने श्री यशलक्ष्मी आर्ट आणि पद्मनाभ ठकार यांच्या विशेष सहकार्याने ‘अमृतवाणी-अनेकता मैं एकता’ हा कार्यक्रम केला. वीस मैलांवर जशी भाषा बदलते. तसा भारताचा विचार केल्यास भाषेमधील वैविध्य प्रकर्षाने समोर आले. भारतात १८०० हून अधिक भाषा, बोलीभाषा, उपभाषा बोलल्या जातात. या सर्व भाषांवर त्या त्या भागांतील संस्कृती, संगीत, परंपरा, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती यांचा ठळकपणे प्रभाव दिसून येतो. देशातील ही विविधता भाषा आणि गाण्यांच्या स्वरूपात जगापर्यंत पोहोचावी या उद्देशाने मी हा विक्रम करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला.

Story img Loader