विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यास मुभा दिली आहे. मात्र उच्च शिक्षण संस्थाकडून विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखल्यासाठी आग्रह धरण्यात येत असून, या प्रमाणपत्रांअभावी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणी येत असल्याचे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता येण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश यूजीसीने विद्यापीठांना दिले.

हेही वाचा- पुणे : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार प्रकरणात एकाला दहा वर्षे सक्तमजुरी

upsc training center loksatta news
जिल्हास्तरावर यूपीएससी, एमपीएससीचे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार? सुधारणा समितीसमोर…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
recruitment of professors loksatta
विश्लेषण : प्राध्यापक भरतीचे होणार काय?
state education board decision tenth twelth examination
दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत राज्य मंडळाचा मोठा निर्णय… आता परीक्षेतील गैरप्रकारांना चाप
ten thousand teachers will be recruited in the second phase through pavitra portal
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात किती शिक्षकांची होणार भरती?
Why is there a conflict between two groups of MPSC over the demand for increase in seats
जागावाढीच्या मागणीवरून ‘एमपीएससी’च्या दोन गटांमध्ये संघर्ष का सुरू आहे? ही आहेत कारणे
UGC , notifications , UGC news, UGC latest news,
यूजीसीच्या दोन अधिसूचना चर्चाग्रस्त ठरताहेत, कारण…
article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी

आतापर्यंत विद्यार्थ्यांना दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण एकावेळी घेण्याची परवानगी नव्हती. पूर्णवेळ पदवीचे शिक्षण घेताना पदविका किंवा अर्धवेळ पदवीचे शिक्षण घेता येत होते. मात्र यूजीसीने अलीकडेच नियमांत बदल करून एकाचवेळी दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम करण्यास मुभा दिली. एकाच वेळी दोन पूर्णवेळाचे पदवी अभ्यासक्रम करताना एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष, तर दुसरा ऑनलाइन किंवा दूरस्थ असणे आवश्यक आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना यूजीसीने प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभतेने होण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश युजीसीने सप्टेंबरमध्ये देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना दिले होते.

हेही वाचा- ‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश

या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थाकडून विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखल्यासाठी आग्रह धरण्यात येत असून, या प्रमाणपत्रांअभावी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमांचा उद्देश सफल होत नसल्याचे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता येण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश यांनी पुन्हा एकदा विद्यापीठांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले.

Story img Loader