पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलीस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त फुले वाड्यात येऊन आंबेडकर यांनी अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. देशात मुस्लिम आणि ओबीसी समाजाला लक्ष्य केले जात आहे. समाजात अशांतता निर्माण केली जात असून आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा त्यासाठी वापर केला जात आहे, असा आरोप करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “७० लाख मतदार अचानक…”, राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Anjali Damania on Shashtri
Anjali Damania : “अतिशय आदरपूर्वक मला…” महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
loksatta editorial on Stampede at Mahakumbh in Prayagraj
अग्रलेख: मेजॉरिटीची मौनी ममता!
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
landslide in left main canal of Tilari Dam
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड; त्यामुळे रस्ता, शेती, बागायतीमध्ये पाणी

हेही वाचा – ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कर्मचारी अटकेत

ते म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी मुस्लिम संघटनांची मुंबई येथे बैठक झाली. मुस्लिम संघटना आठ डिसेंबर रोजी पॅलेस्टाईन या विषयावर सभा घेणार आहेत. मुस्लिम समाजाची सभा असल्याने भाजप त्याकडे वेगळ्या नजरेने पहात आहे.

हेही वाचा – आता थांबायचं नाही, हक्कावर गदा येत असेल तर लढायचं – छगन भुजबळ

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कारागृहातून मीच बाहेर काढले. मात्र, त्यांनी त्याबाबत माझे कधी आभार मानले नाहीत. मलाही कोणाची गरज नाही. मंडल आयोगाचा इतिहास पाहिल्यावर वस्तुस्थिती कळेल. इतिहास पाहिला तर मीच ओबीसीचा जनक असल्याचे दिसेल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Story img Loader