हिमालयीन भागात तयार झालेल्या पश्चिमी चक्रावाताचा परिणाम उत्तर भारतात झाला आहे. त्यामुळे या भागात दाट धुके आणि थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात अद्याप बोचरी थंडी पडलेली नाही. दरम्यान, राज्यात दिवसभरात औरंगाबादचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नीचांकी नोंदविण्यात आले. सलग तिसऱ्या दिवशी औरंगाबादेतील किमान तापमान नीचांकी नोंदविण्यात आले आहे.

हेही वाचा- Mukta Tilak Passes Away : मुक्ता टिळक यांना देवेंद्र फडणवीसांनी अर्पण केली श्रद्धांजली, म्हणाले…

Fish drought like conditions Dapoli coast strong wind speed fish trade
दापोली किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ सदृश्य परिस्थिती, जोरदार वाऱ्याच्या वेगामुळे मच्छीची करोडो रुपयांची उलाढाल थांबली
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
nisargalipi A sign of arrival of spring season
निसर्गलिपी : वसंतागमनाची चाहूल
Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
pimpri leopard news in marathi
पिंपरी : निगडीत बिबट्याचा शिरकाव; अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली असली, तरी बोचरी थंडी अद्याप पडलेली नाही. पहाटे आणि सकाळच्या सुमारास थंडी जाणवत आहे. त्यानंतर दुपारपासून सायंकाळपर्यंत वातावरणात एक प्रकारचा उष्मा जाणवत आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी थंडी पडत असल्याचे वातावरण आहे.

हेही वाचा- पुणे: ‘रॅपिडो’चा परवाना अर्ज नाकारला;‘रॅपिडो ॲप’चा वापर न करण्याचे ‘आरटीए’चे प्रवाशांना आवाहन

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आता उत्तरेकडे सरकला असून पुढील ४८ तासांत तो कोमोरीन भाग पार करून श्रीलंकेकडे सरकणार आहे. त्यामुळे दक्षिणेकडून महाराष्ट्राकडे येणारे बाष्पयुक्त वारे कमी होणार आहेत, तर उत्तरेकडून राज्याकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण अजूनही कमी आहे. या थंड वाऱ्यांचा प्रभाव पुढील दोन ते तीन दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना बोचरी थंडी अनुभवण्यास मिळण्याची शक्यता जास्त आहे.

राज्यातील महत्त्वाच्या शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये

शहर कमाल किमान

पुणे ३२.६ १२.९

जळगाव ३१.५ १३.४

कोल्हापूर ३२.१ १७.०

महाबळेश्वर २८.० १५.०

नाशिक ३१.६ १३.२

सांगली ३२.७ १५.१

सातारा ३२.४ १४.३

सोलापूर ३४.२ १५.९

मुंबई ३०.२ २२.४

अलिबाग ३०.६ १८.८

रत्नागिरी ३४.० १८.५

औरंगाबाद ३१.२ ११.०

परभणी ३१.८ १३.४

अकोला ३४.० १४.८

अमरावती ३३.६ १४.१

बुलढाणा ३१.२ १४.८

चंद्रपूर २९.२ १५.२

गोंदिया २९.२ १२.०

नागपूर ३०.५ १३.३

वर्धा ३१.१ १४.०

यवतमाळ ३१.२ १३.५

Story img Loader