लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणांत मिळून १०० टक्के पाणीसाठा झालेला नाही. शहर आणि परिसरात गेले काही दिवस पाऊस हजेरी लावत असला, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत नसल्याने यंदा गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार नसल्याची स्पष्टोक्ती जलसंपदा विभागाकडून मंगळवारी करण्यात आली.

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!

यंदा विलंबाने सक्रीय झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या अखेरीस चांगली सुरुवात केली. त्यानंतर दडी मारलेला पाऊस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सक्रीय झाला. त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट महिन्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात विशेष पावसाने हजेरी लावली नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमधून यंदा मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गही करण्यात आलेला नाही. सध्या वरसगाव आणि पानशेत धरणे १०० टक्के भरली आहेत, तर खडकवासला धरणात ७९ टक्के, तर टेमघर धरणात ७७ टक्के पाणीसाठा आहे.

आणखी वाचा-‘सायन्स काँग्रेस’मधून केंद्र सरकार बाहेर; पुढील वर्षी होणाऱ्या संमेलनाला सहकार्यास नकार 

दरवर्षी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होतो. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. तसेच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे चारही धरणे भरून मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी पुढे जाऊन उजनी धरणाला मिळते. दरवर्षी गणेश विसर्जनापर्यंत चारही धरणे १०० टक्के भरतात. त्यामुळे खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यात आणि मुठा नदीत गणेश विसर्जनासाठी पाणी सोडण्यात येते. यंदा तशी परिस्थिती नसल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. सध्या सिंचन आवर्तन सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे.

Story img Loader