पुणे : ऐन सणासुदीत तूरडाळ महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी १०० रुपयांवर असलेली तूरडाळ आता १६० ते १७० रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी २० रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी झालेले कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढय़ा दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे. तूरडाळ दोन महिन्यांत १०० ते ११० रुपयांवरून १६० ते १७० रुपयांवर गेली आहे. हरभरा डाळ ५७ ते ५८ रुपयांवरून ७० रुपये प्रति किलोवर गेली (पान ४ वर) (पान १ वरून) आहे. उडीद डाळ ९० रुपयांवरून ११० रुपये प्रतिकिलो झाली असून, मसूर डाळही ५८ ते ६० रुपयांवरून ७०-७२ रुपयांवर गेली आहे. मूग डाळ ८० ते ८५ रुपयांवरून ११० रुपयांवर गेल्याची माहिती डाळीचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.

Rupee biggest fall in two weeks print eco news
रुपयाची दोन आठवड्यांतील सर्वात मोठी आपटी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Record daily collection of 1 crore 71 lakh liters of milk in the financial year
राज्यात दुधाचा ‘महापूर’; गत आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख लिटरचे दैनंदिन विक्रमी संकलन
Loksatta editorial challenges before fm nirmala sitharaman in union budget 2025
अग्रलेख: सीतारामन ‘सिंग’ होतील?
Many people including businessman were cheated of Rs 2 crore by promising double profits
दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्यासह अनेकांना दोन कोटीचा गंडा
Congress Statistical Analysis Department head Praveen Chakraborty allegations regarding voter turnout Mumbai news
मतदारवाढ अनाकलनीय; काँग्रेसच्या सांख्यिकी विश्लेषण विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांचा आरोप
Loksatta samorchya bakawarun February 1st upcoming budget
समोरच्या बाकावरून: दिल्लीतील कुजबुज असे सांगते की…
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?

हेही वाचा >>> “…आम्ही तिथे नसतो”, इंडिया आघाडीतल्या प्रवेशावर राजू शेट्टींचं मोठं वक्तव्य

खरीप हंगामात अवकाळी, गारपीट, उष्णतेच्या झळांमुळे कडधान्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. देशात डाळींचा तुटवडा जाणवू नये, यासाठी केंद्र सरकारने कडधान्ये, डाळींच्या आयातीवरील कर २९ मार्च २०२२ रोजी हटवला. ३१ मार्च २०२४ पर्यंत डाळींच्या आयातीवर कोणताही कर असणार नाही. तरीही अपेक्षित प्रमाणात डाळींची आयात होताना दिसत नाही. देशात उत्पादित झालेली तूर पावसात भिजल्यामुळे दर्जा घसरला आहे. १०० किलो तुरीपासून जेमतेम ६०- ६५ किलो डाळ मिळते आहे. त्यामुळे डाळमिल चालकही चांगल्या तुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून शेतकरी विक्री करत असलेल्या तुरीला मंगळवारी, २९ ऑगस्ट रोजी सरासरी १०,००० ते १३,००० रुपये दर मिळाला. त्यावर प्रक्रिया, वाहतुकीसह अन्य खर्च गृहीत धरता नजीकच्या भविष्यात तूरडाळीच्या दरात घट होण्याची शक्यता दिसत नाही, असेही नहार यांनी सांगितले.

कडधान्य लागवडीत घट

देशभरात खरीप हंगामात कडधान्यांच्या लागवडीत घट झाली आहे. जूनअखेपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तरच कडधान्यांची लागवड होते. यंदा जुलैअखेरीस पाऊस झाल्यामुळे कडधान्यांचा पेरा घटला आहे. गेल्या वर्षी २५ ऑगस्टअखेर देशात १२८.०७ लाख हेक्टरवर कडधान्यांची लागवड झाली होती. यंदा ती ११७.४४ लाख हेक्टरवर घसरली आहे. तुरीची लागवड ४२.११ लाख हेक्टर, उडीद ३१.१० लाख हेक्टर, मूग ३०.६४ लाख हेक्टर कुळीथ ०.२६ लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची १३.३४ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवडीत घट झाल्यामुळे पुढील वर्षभर डाळींचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader