आळंदी: जळगाव मध्ये क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची छेड काढल्याचे प्रकरण नुकतच समोर आल आहे. या प्रकरणानंतर मंत्री उदय सामंत यांनी छेडछाडीचे प्रकरण असल्यास पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी. पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घेऊन अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे असा आवाहन केल आहे. उदय सामंत हे आळंदीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव वर्ष ७५० वे या निमित्ताने “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली.
उदय सामंत म्हणाले, छेडछाडीचे प्रकार घडत असतील तर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी मवाळ धोरण न घेता जहाल भूमिका घ्यावी घेऊन अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. करुणा मुंडे वरील प्रश्नाला उदय सामंत यांनी उत्तर देणं टाळलं. ते म्हणाले, मी नेहमीच राजकीय प्रश्नांना उत्तरे देतो. आज सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. पुढे ते म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत माझ्यावर जबाबदारी दिली होती. त्याबाबत चा डीपीआर तयार करायला सुरुवात केली आहे. एमआयडीसी, पर्यावरण विभाग, एमआरडीए, पीसीएमसी आणि पीएमसी आहे. या सगळ्यांच्या सहभागाने दोन ते अडीच हजार कोटींचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण होईल. अस उदय सामंत म्हणाले आहेत.