पुणे : कसबा आणि चिंचवडच्या दिवंगत आमदारांच्या निधनानंतर तातडीने पोटनिवडणूक जाहीर करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दात कानउघडणी केली आहे. तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्याठिकाणी निवडणुका घेतल्या, मग मागील एक वर्षापासून शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत, असे सांगत वसंत मोरे यांनी महापालिका निवडणुका कधी घेणार? अशी विचारणा केली आहे. त्यासंदर्भातील समाजमाध्यमातूनच त्यांनी पोस्ट करत सरकारची पोटनिवडणुकीवरून कानउघडणी केली आहे.

हेही वाचा – पुणे : बंडखोरी रोखण्यात काँग्रेस यशस्वी; बाळासाहेब दाभेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
Atishi alleges Arvind Kejriwal murder conspiracy
Atishi : अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट, मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप; म्हणाल्या, “दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, कारण…”

हेही वाचा – कसब्यात काँग्रेसला बंडखोरी टाळण्यात यश, चिंचवडमध्ये तसं होऊ शकतं का? अजित पवार म्हणाले..

माझा शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या दोन आमदारांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सरणाची राख अजून निवली सुद्धा नाही, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या-त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. निधी नसल्यामळे नागरिकांना चेहरा दाखवावा वाटत नाही. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो, जर कोणत्या पक्षाला सहनुभूती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असाल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण, जो मनातून हरतो तो रणात काय जिंकणार, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

Story img Loader