ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी ( वय ९५) यांचे गुरुवारी दुपारी वॄद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.रत्नागिरी येथे १३ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्म झालेल्या जोशी या पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या अनुग्रहित शिष्या होत्या. रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे घर शेजारीच असल्याने लहानपणापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. सावरकर त्यांना मुलगी मानत असत. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मॄणालिनी जोशी यांनी लिखाणाला सुरवात केली. देशभक्त, आध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन, काव्यलेखन यावर त्यांनी भर दिला. जीवनात भेटलेल्या संत-महंतांच्या सहवासातील आठवणींवर आधारित आलोक हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा