पुणे : टेमघर धरणातून होणाऱ्या पाणीगळतीबाबत गळती प्रतिबंधक कामे हाती घेतल्यानंतर गळतीच्या प्रमाणात लक्षणीय घट (९३ टक्के) झाली आहे. मात्र, अद्यापही १९७ लीटर प्रतिसेकंद धरणातून पाणीगळती होत असल्याचे आढळून आले आहे, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली.

हेही वाचा >>> राज्य सरकारचा अधिकाऱ्यांवर भरवसा नाय?… ‘हा’ घेतला निर्णय

Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
flood report pune, flood pune, pune flood report,
पुणे : पूरस्थितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याची गरज काय? कोणी मांडली ही अजब भूमिका
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?
seven women burnt by firecrackers during Ganpati immersion in umred
Video : फटाक्यामुळे ७ महिला भाजल्या, नागपुरातील उमरेडमध्ये गणपती विसर्जन मरवणुकीतील दुर्घटना
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम

खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात होत असलेली पाणी गळती रोखण्यासाठीच्या प्रभावी उपाययोजनेचे काम प्रगतीपथावर आहे. टेमघर धरणातील गळतीच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव वि. म. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली टेमघर धरण तज्ज्ञ समिती (टीडीईसी) स्थापन केली होती. या समितीने धरणाची पाहणी करून अल्पकालीन गळतीप्रतिबंधक उपाययोजना आणि दीर्घकालीन धरण मजबुतीकरण उपाययोजना अशा दोन भागांत दुरुस्ती कामे सुचविली होती.

हेही वाचा >>> केंद्राची लवकरच ‘एवढ्या’ कोटींची दुष्काळी मदत; केंद्रीय पथकाकडून पाहणी पूर्ण

समितीने सुचविल्याप्रमाणे अल्पकालीन गळती प्रतिबंधक उपाययोजनांची कामे आपत्कालीन परिस्थितीत सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आली होती. या कामासाठी एकूण २५२.६६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १०१.५१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.’ दरम्यान, टेमघर धरणातून सन २०१० पासून गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. सन २०१६-१७ मध्ये गळतीचे प्रमाण २५८७ लीटर प्रतिसेकंद एवढे होते. गळती प्रतिबंधक कामे हाती घेतल्यानंतर गळतीच्या प्रमाणात लक्षणीय घट (९३ टक्के) होऊन हे प्रमाण १९७ लीटर प्रतिसेकंद एवढे आढळून आले. पाणीगळती १०० टक्के बंद होण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही प्रगतीत आहे, असेही फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे.