लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सातारा जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) राज्य शासनाकडे कोयना धरण परिसरातील मुनावळे या गावी जलपर्यटन विकसित करण्याचा प्रस्ताव सन २०२२ मध्ये पाठविण्यात आला होता. त्याला राज्य शासनाच्या शिखर समितीने मान्यता दिली होती. या प्रकल्पाचे बांधकाम हे कृष्णा खोरे विकास महामंडळाद्वारे करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, तर हा प्रकल्प एमटीडीसी चालविणार आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही, तसेच जल पर्यटन श्रेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच पर्यावरणस्नेही बोटींचा वापर करण्यात यावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. पर्यटकांसाठी नियमानुसार आवश्यक त्या विमा सवलती आणि वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

water tariff hike over the citizens of Ahilyanagar
अहिल्यानगरमधील नागरिकांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
paithan sant Dnyaneshwar garden news
पैठणच्या अर्थकारणाला ज्ञानेश्वर उद्यानामुळे संजीवनी, दररोज हजार पर्यटक
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
hingoli bogus applications for crop insurance
हिंगोलीतही १८१४ बोगस पीक विमा अर्ज आले समोर; बेचीराख, शासकीय जमिनीवरही काढला विमा
डोंबिवलीतील बेकायदा इमारती नियमानुकुलनाचे ३८ प्रस्ताव फेटाळले, झिरो मार्जीनमध्ये उभारलेल्या ५८ इमारती बेकायदाच
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते

याबाबतचा शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे उपसचिव संतोष रोकडे यांनी प्रसृत केला. कोयना धरण किंवा शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये राज्य शासनाने अंशत: बदल केला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूच्या सात कि.मीपर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरित जलाशयाचा ८० कि.मीचा परिसर पर्यटनदृष्टय़ा विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आणखी वाचा-सासवड: मतदान यंत्रांची चोरी; दिल्लीतून गंभीर दखल, कारवाई सुरू

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी ४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोयना धरण परिसरात जंगले, सह्याद्री डोंगररांगा, निळेशार पाणी असे निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. शिवसागर जलाशयात जलपर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार संधी निर्माण होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्था विकसित होऊ शकणार आहे.

Story img Loader