पुणे : शहरातील पाणीचोरीला आळा घालण्यासाठी महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली असली, तरी या योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीतूनही पाणीचोरी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. समान पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांवर ७०० अनधिकृत नळजोड घेण्यात आले असून, जलवाहिनी टाकणाऱ्या कंपनीने त्याचा अहवाल महापालिकेच्या पाणीपुरठा विभागाला दिला आहे.

शहराला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. ही योजना साडेचार हजार कोटींची असून, एक हजार ६०० किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकणे, जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांची दुरुस्ती, ८३ साठवणूक टाक्यांची उभारणी आणि निवासी तसेच व्यावसायिक मिळकतींना जलमापक बसविणे अशा टप्प्यात कामे सुरू करण्यात आली आहेत. योजनेसाठी शहराचे १४१ विभाग करण्यात आले असून, काही विभागांतील कामे पूर्ण झाली आहेत.

Mahavitaran electricity customers increased adding 74 thousand new electricity connection in two years
महावितरणचे वीज ग्राहक वाढले, दोन वर्षात ७४ हजार नवीन वीज जोडण्या
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद
Symbolic shutdown of food grain traders tomorrow wholesale and retail markets across the state closed
अन्नधान्य व्यापाऱ्यांचा उद्या लाक्षणिक बंद, राज्यभरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा बंद
displaced families in Dharavi redevelopment project
ठाण्याच्या वेशीवर नवी ‘धारावी’!
Online facility available for transfer in slum redevelopment Mumbai
झोपु घरांचे स्थलांतर आता सोपे! ॲानलाईन सुविधा उपलब्ध
The dams supplying water to Mumbai are more than 98 percent full
लेख: मुंबईला पाण्याची चिंता हवी; पण कशी?
nmmc providing clean pure water to navi mumbaikars test 2000 water samples
नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुद्ध पाणीपुरवठा; पाण्याच्या दोन हजार नमुन्यांच्या तपासणीतून स्पष्ट

हेही वाचा – पीएमआरडीए – महापालिका आमनेसामने; ‘पुणेरी मेट्रो’च्या स्थानकांचा तिढा

जलवाहिनीची कामे पूर्ण झालेल्या विभागाचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. जलकेंद्र किंवा साठवणूक टाक्यांतून जलवाहिनीत पाणी सोडल्यानंतर ते किती वेळात घरात पोहोचते, याची तपासणीही करण्यात आली होती. त्या वेळी ७०० ठिकाणच्या जलवाहिन्यांवर अनधिकृत नळजोड घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसा अहवाल योजनेचे काम करणाऱ्या कंपनीने महापालिकेला दिला आहे. जलपमाक असतानाही अनधिकृत नळजोड घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे योजनेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, समान पाणीपुरवठा योजनेचे काम पोलीस बंदोबस्तात करण्याची सूचना महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी केली आहे. तसेच योजनेतून पाणी चोरी करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

हेही वाचा – आजी-माजी राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट

समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू आहे. तपासणीवेळी काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. त्यावर कारवाई केली जाईल. – नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग