पुणे : ‘देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे. विरोध करणारे आवाज दाबले जातात. मतपेटीतून विरोध व्यक्त करण्यासाठीही विश्वास राहिलेला नाही. सामान्य माणसाला खिरापती वाटून, प्रलोभने दाखवून वेळप्रसंगी दडपशाही करून गंडवले जाते. विशिष्ट विचारसरणीचे लोक सत्तेत बसून हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार करत आहेत. गांधींच्या विचारांना न मानणारे लोक, त्यांच्याच पुतळ्याला नमस्कार करून राज्यकारभार चालवत आहेत. आजचे राजकारणी हुकूमशहा बनले आहेत. संवेदनशील झाले आहेत. अशा वेळी सत्याग्रहाला, गांधींना मानणारे साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते असो की, सर्वसामान्य माणूस असो, ज्यांच्या मनात विद्रोहाची वात तेवते आहे आहे, त्या सर्वांनीच अंतःकरणातला झरा मोकळा करायला हवा, आता सत्याग्रह करायला हवा. नाहीतर इतिहास माफ करणार नाही,’ अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी रविवारी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा