पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल दरवाढीविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यांनी मागे का घेतली? कुणाच्या सांगण्यावरून घेतली असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिकिया आली आहे. याचिका मागे घेण्यामागे काही ‘सेटलमेंट’ झाली आहे, असे मी म्हणणार नाही, असे सांगत अधिक भाष्य करणे टाळले.

टोल दरवाढीविरोधात मनसे नेते राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या टोल दरवाढीविरोधात येत्या दोन चार दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टोल दरवाढीविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यांनी मागे का घेतली? असा प्रश्न केला होता.

Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Eknath Shinde, reservation,
Eknath Shinde : आरक्षण रद्द करणाऱ्यांविरोधात आम्ही उभे राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
champai soren will join bjp
ठरलं! चंपई सोरेन ‘या’ तारखेला भाजपात प्रवेश करणार; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; म्हणाले…

हेही वाचा – पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन

हेही वाचा – “राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी…”, जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला

यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी टोल वसुलीविरोधातील याचिका मागे घेतली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय चर्चा झाली असेल. त्यामुळे याचिका मागे घेतली असेल. यामध्ये ‘सेटलमेंट’ झाली आहे, असे मी म्हणणार नाही. टोल प्रकरणात माझा फार अभ्यास नाही.