पुणे : २०६ व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून चर्चा सुरू आहे. त्या सर्व चर्चांदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामुळे कधी ना कधी औपचारिक अनौपचारिकरित्या भेट होणारच आहे. त्यामुळे अफवा पसरवण्यात काहीही अर्थ नाही. इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी घ्यायचे हे आत्ता त्यांनी ठरवायचं आहे. पण आत्ता तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीचे दार बंद आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
हेही वाचा – थंडीच्या लाटांची शक्यता कमीच
नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सत्तेत येणे, संविधान वाचवणे, शांतता हे आमचं या वर्षाचं संकल्प असणार.