पुण्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयांत ही पाहणी करण्यात आली. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होण्याचे कारण त्याचा पुरेसा अभ्यास झालेला नसतो यावर ८९ टक्के तरूण ठाम आहेत. दीड टक्का तरूण म्हणतात की देवावर श्रद्धा नसल्यामुळेच विद्यार्थी नापास झाला असावा! तर ९ टक्के तरुणांना हे दोन्ही पर्याय पटले आहेत. तसेच ५२ टक्के जणांच्या मते आपल्या जीवनावर ग्रह-राशींचा अजिबात परिणाम होत नाही. ४१.५ तरुणांच्या मते काही प्रमाणात परिणाम होतो. तर ग्रह-राशींचा जीवनावर भरपूर परिणाम होतो असे म्हणणारेही ६ टक्के जण आहेत. एखाद्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडण्यासाठी ६ टक्के तरुणांच्या मते व्यक्तीची ग्रहदशा किंवा साडेसाती सुरू असणे कारणीभूत आहे. ४.६ टक्के जण करणी किंवा ब्लॅक मॅजिकमुळे मानसिक संतुलन बिघडते असे म्हणतात. तर ८९ टक्के तरूण मानसिक संतुलन बिघडण्याचा संबंध ताणतणावाशी असू शकेल असे म्हणत आजाराचे वैज्ञानिक कारण शोधू पाहतात. ८० टक्के तरुणांच्या मते संख्याशास्त्राचा (न्युमरॉलॉजी)वापर करून आपल्या नावाचे स्पेलिंग बदलण्याचा यशापयशाशी काहीही संबंध नसतो. १५ टक्के जण स्पेलिंग बदलल्याने यशापयशात थोडासा फरक पडत असल्याचे सांगतात तर ४.६ टक्के तरुणांच्या मते स्पेलिंग बदलल्याने भरपूर फरक पडतो!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा