‘ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण’ या सिद्धांतावर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर आपले अधिराज्य गाजविले. त्यांना जाऊन एक वर्षसुद्धा झाले नाही, आणि त्यांच्या नावावरून, स्मारकावरून जे राजकारण होतेय त्याबद्दल शिवसैनिक नव्हे तर तमाम महाराष्ट्राच्या मनांत चीड निर्माण झाली आहे. रेसकोर्सवरील स्मारकावरून काँग्रेस धनाढय़ांचे चोचले पुरवते. तर राष्ट्रवादीने ‘सी-लिंक’ पुलाला सावरकरांच्या ऐवजी राजीव गांधींचे नाव दिले. तेव्हा त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण का नाही झाली? मनसेने वेळोवेळी स्मारके, पुतळे, नामांतर याबाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. मग आता नवीन पुलाला बाळासाहेबांचे नाव देण्यात आग्रही का? मग रेसकोर्सवरील ‘थीम पार्क’साठी तेवढा आग्रह का नाही? रिपाइं युतीत असूनसुद्धा केवळ राजकीय दबावासाठीच नावाबद्दलची भूमिका घेत आहेत.
एकंदरीतच बघता काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि रिपाइं सोयीनुसार आपले राजकारण करत आहेत, हे समजायला जनता काय दूधखुळी नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे आणि गलिच्छ राजकारण थांबवावे.
पुरुषोत्तम आठलेकर, डोंबिवली (पूर्व)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा