गुजरातमध्ये २००२ च्या दंगलीसंदर्भात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निर्दोष ठरवणारा विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य मानल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी गुजरात पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड, गुजरातचे निवृत्त पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांना अटक केली आणि त्यांच्यासह माजी पोलीस अधिकारी संजीव भट (आधीच तुरुंगात) यांची चौकशी करण्यासाठी नवी ‘एसआयटी’ही स्थापन केली. या दंगलीत मारले गेलेले काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांची पत्नी झाकिया यांनी, गुजरात दंगलीप्रकरणी पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी करणारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली गेल्यानंतर, गुजरातमधील सरकारी आणि पोलिसी यंत्रणा आश्चर्य वाटावे इतक्या वेगाने ‘कार्यरत’ झाल्या. या तिघांविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशपत्रातील उतारा उद्धृत केला आहे. त्यामध्ये या तिघांविरोधात ‘कायदेशीर कारवाई केली पाहिजे’, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या ‘एसआयटी’च्या अहवालाविरोधात दाद मागणाऱ्यांचीच चौकशी केली जाणार आहे. खरे तर झाकिया जाफरी आणि तिस्ता सेटलवाड यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे निर्दोषत्व अबाधित राहिले. मग, न्यायाची मागणी करण्याचा संविधानाने दिलेला हक्क बजावणाऱ्या नागरिक, संघटनांविरोधात चौकशीचा फेरा लावून सत्ताधारी राजकीय पक्ष वा सरकारी यंत्रणांना नेमके काय सिद्ध करायचे आहे? शिवाय सरकारी यंत्रणा सामाजिक कार्यकर्त्यांशी वागतात तशाच या आधी इतर कोणताही आरोप नसलेल्या श्रीकुमार यांच्यासारख्या सरकारी अधिकाऱ्यांशीही वागणार का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा