तंत्रज्ञानातले आणि बाजारपेठेतले बदल अर्थकारणात नेहमी काही ना काही उलथापालथ घडवून आणत असतात. त्या बदलांमुळे, आर्थिक मंदीमुळे आणि कधी व्यावसायिक आडाखे चुकल्यानेही उद्योग-व्यवसाय कालबाहय़ होतात, अपयशी ठरून आजारी पडतात; आणि त्यांची जागा नवे उद्योग-व्यवसाय घेत असतात. एका परीने पाहिलं तर उद्योग-जगतातली अवतारसमाप्ती आणि संहार या गोष्टी नव-सृजनासाठी आवश्यकही असतात. आजारी, अडचणीत आलेल्या किंवा बंद पडलेल्या उद्योगांमध्ये गोठलेली आर्थिक ऊर्जा आणि भांडवल पुन्हा वाहतं होणं हे अर्थकारणाचा प्रवाह चालू राहण्यासाठी आवश्यक असतं. बहुतेक अर्थव्यवस्थांमध्ये आजारी उद्योगांमधली आर्थिक ऊर्जा अशी मोकळी करण्यासाठी आवश्यक अशा कायदेशीर तरतुदी असतात. आजारी उद्योगांमध्ये कर्जदारांची, पुरवठादारांची, कामगारांची देणी थकलेली असतात. अशा उद्योगांचं आणि त्यांच्या मालमत्तेचं काय करायचं, याचा निर्णय त्या कायद्यांनुसार आणि घेणेकऱ्यांचं हित लक्षात घेऊन घेतला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा