मानवी इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे असे बरेचदा म्हटले जाते. सशस्त्र संघर्षांला मानवाच्या उत्क्रांतीमध्ये, समाजाच्या जडणघडणीत, संस्कृतींच्या उभारणीत किंवा फेररचनेत इतके महत्त्व आहे. माणसाचा युद्धाशी संबंध जितका जुना आणि गहिरा आहे तितकाच युद्धाच्या वैधतेचा प्रश्नही पुरातन आहे. कुरुक्षेत्रात कौरव-पांडव सेना समोरासमोर उभी ठाकली आहे आणि महाप्रतापी अर्जुनाच्या मनात ऐन वेळी किंतु निर्माण होतो आणि तो श्रीकृष्णाला म्हणतो, ‘दृष्ट्वेमान् स्वजनान् कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्। सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति॥’ आणि अर्जुनाचा सखा त्याला सल्ला देतो, ‘हतो वा प्राप्यसि स्र्वग जित्वा वा भोग्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय:॥’ अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे, हे माझे आप्तस्वकीय, भाऊबंद, गुरू युद्धाला समोर उभे ठाकलेले पाहून माझी गात्रे शिथिल पडत आहेत, माझ्या तोंडाला कोरड पडली आहे आणि माझ्या हातातून हे महाप्रतापी गांडीव धनुष्य गळून पडत आहे. तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतो की, युद्धात धारातीर्थी पडलास तर स्वर्गात स्थान मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील. तेव्हा जया-पराजयाचा किंवा परिणामांचा विचार करू नकोस. क्षत्रिय म्हणून रणांगणात उभा असताना युद्ध करणे हे तुझे आद्यकर्तव्य आहे आणि ते तू कर. (आजच्या भाषेत सांगायचे तर इट्स अ विन-विन सिच्युएशन, गो फॉर इट.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा