अनुप, बिहारसारख्या मागास राज्यातल्या एका दुर्गम गावात राहणारा मुलगा. या गावाला नक्षलवाद्यांचे ग्रहण लागलेले. अशा गावात अनुपच्या कुटुंबाला रोजच्या दोन वेळच्या जेवणाची चणचण ही रोजचीच. आठ वर्षांचा असताना अनुप भुकेने अगदी व्याकूळ झाला होता. त्याची ती अवस्था पाहून त्याच्या आईने अनुपच्या वडिलांना थोडे तांदूळ मिळाले तर पाहा, म्हणून सांगितले. तांदूळ आणायला गेलेले वडील परतलेच नाहीत. खूप शोधाशोध केली, पण त्यांचा पत्ता काही लागू शकला नाही. कोणी म्हणे त्यांना नक्षलवाद्यांनी पकडून नेले. अनुपला त्याचे वडील काही मिळाले नाहीतच. अनुप मोठा झाला तो सुडाची भावना घेऊनच. त्याची आई मात्र जाणत होती की, या सगळ्यावर मात करण्यासाठी मोठे शस्त्र म्हणजे शिक्षण. तिने अनुपला शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. अनेकदा उपाशीपोटी राहून अनुप दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला खरा, पण पुढे काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा