नारद मंजुळ सुस्वरे गीत गाय। मार्गी चालताहे संगे हरी।। तुका म्हणे त्याला गोडी किर्तनाची। नाही आणिकांची प्रीती ऐसी।। असा साधक मग सुस्वरात अर्थात एकरसयुक्त अशा एकसुरात, अंतरात्म्याशी एक लय साधणाऱ्या स्वरात त्या परमात्म्याचंच गुणगान करीत, नामगान करीत, लीलागान करीत जगू लागतो आणि त्याला सत्संग असतो तो केवळ त्या हरीचा. हरी म्हणजे हरण करणारा. ‘मी’पणाचं आणि त्यासकट समस्त दु:खाचं हरण करणारा हरी म्हणजे सद्गुरूच. त्या हरीचा बोध, त्या हरीचा पाठ तो हरीपाठ. त्यानुसार जगण्यात साधकाला आनंद वाटू लागला की मग त्याला केवळ त्याचीच गोडी उरते. आसक्तभावानं जगात असलेली गोडी पुरती ओसरते. इतर कशाची प्रीती उरत नाही. आता जो असा हरिमय जीवन जगत आहे, त्याला कसली भीती उरेल? मग नुसत्या चिंतनाची ही कथा तर तो हरीच जिथे स्वये निजसामथ्र्ये नांदत आहे तिथे म्हणजे त्या पातळीवर भक्तही राहू लागला तर? मग सर्वात मूळभीती अशी काळाची भीतीही उरणार नाही. ‘‘हो कां जे द्वारकेआंत। न रिघे भय काळकृत। जेथ स्वयें श्रीकृष्णनाथ। असे नांदत निजसामथ्र्ये।। दक्षशापु नारदासी पाहीं। मुहूर्त राहों नये एके ठायीं। तो शापु हरिकीर्तनीं नाहीं। यालागीं तो पाहीं कीर्तननिष्ठु।। ज्याची गाइजे कीर्तनीं कीर्ती। तो द्वारकेसी वसे स्वयें श्रीपती। तेथें शापबाधेची न चले प्राप्ती। यालागीं नित्यवस्ती नारदासि तेथें।।’’ मग ही स्थिती प्रत्येकाला प्राप्त व्हावी, या हेतूने एकनाथी भागवतात म्हंटलं आहे की, शाश्वत सुखाची प्राप्ती करण्यासाठी माध्यम म्हणून उत्तम असा मनुष्यजन्म मिळाला. असे असूनही जो शाश्वताऐवजी अशाश्वताचंच भजन करण्यात दंग आहे त्याला माया गिळणार यात शंका नाही. (ऐकें बापा नृपवर्या। येऊनि उत्तमा देहा या। जो न भजे श्रीकृष्णराया। तो गिळिला माया अतिदु:खें।।)  परमसुखासाठी परमात्मा हाच एकमात्र साधन असताना लोक इतर अनेक गोष्टींना सुखाची साधनं मानून शिणतात. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ‘कारणाचा आनंद हा कारणापुरता टिकतो’. ज्या कारणामुळे मला सुख मिळतं असं मी  मानतो ते कारण दुरावलं की माझा आनंदही दुरावतो. त्यातून आनंदाचं कारण भासणाऱ्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती मिळविण्याच्या आणि टिकवण्याच्या इच्छेच्या दृढबंधनातच मी अडकतो. मग जो एकदा मिळाला की कधीच दुरावत नाही आणि जो आनंदाचं निधान आहे, अशा परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच मी का प्रयत्न करू नये? (त्यजूनि परमात्मा पूर्ण। नाना साधनें शिणती जन। त्यासी सर्वथा दृढबंधन। न चुके जाण अनिवार।।) माणसाचा धडधाकट देह मिळाला असतानाही जो सद्गुरूंच्या चरणाशी राहात नाही, म्हणजे त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालत नाही त्याचं निर्दालन क्षणोक्षणी काळ करीतच असतो. (असोनि इंद्रियपाटव पूर्ण। जो न भजे श्रीकृष्णचरण। त्यासी सर्वत्र बाधी मरण। क्षणक्षण निर्दाळी।।) यातली एक गूढ ओवी आहे ती म्हणजे- सांडूनि श्रीकृष्णचरण। इंद्रादि देवांचें करितां भजन। ते देव मृत्युग्रस्त पूर्ण। मा भजत्याचें मरण कोण वारी।। तिचा अर्थ पाहू.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sandeep Narayan Sings Marathi Song Kanda Raja Pandhricha
कर्नाटकी शास्त्रीय गायक संदीप नारायण जेव्हा ‘कानडा राजा पंढरीचा’ गातात! जयपूर महोत्सवात ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर
Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Santosh Juvekar
“डोळ्यात पाणी…”, ‘छावा’मधील राज्याभिषेकाच्या सीनबाबत संतोष जुवेकर म्हणाला, “विकी कौशलची एन्ट्री…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Story img Loader