आठ महिन्यांपूर्वी इंडोनेशियात बाली येथे झालेल्या जी-२० राष्ट्रसमूहाच्या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात ‘चर्चा’ झाली होती अशी माहितीवजा कबुली भारतीय परराष्ट्र खात्याने नुकतीच दिली. कबुली असा शब्द मुद्दाम योजावा लागतो; कारण या भेटीविषयी परराष्ट्र खात्याने त्यावेळी फारच जुजबी माहिती दिली होती. राष्ट्रप्रमुखांच्या सन्मानार्थ दिल्या गेलेल्या भोजनानंतर हे दोन नेते परस्परांना क्षणभर भेटले आणि त्यांच्यात जुजबी विचारपूसवजा हस्तांदोलनापलीकडे काहीही घडले नाही, हे जगभरात प्रसारमाध्यमांद्वारे प्रसृत झालेले चित्र. आपल्या परराष्ट्र खात्यानेही त्यावेळी या हस्तांदोलनापलीकडे एखादी भेट वा चर्चा झाली, अशी कोणतीही माहिती दिली नाही. ती आता या खात्याला द्यावी लागली. याचे कारण चीनच्या परराष्ट्र खात्याने तशी ती नुकतीच दिली. गत सप्ताहात ‘ब्रिक्स’ समूहातील देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक दक्षिण आफ्रिकेत झाली. त्यावेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल म्हणाले की, प्रत्यक्ष ताबारेषेवरील चीनच्या कृतींमुळे परस्पर चर्चेसाठीच्या राजकीय आणि सार्वजनिक अधिष्ठानाला बाधा पोहोचते. हे शब्द थेट आणि नेमके, म्हणून त्यांचे स्वागतच. परंतु चीनचे वरिष्ठ परराष्ट्र व्यवहार व सुरक्षा सल्लागार आणि तेथील पॉलिट ब्यूरोचे सदस्य वँग यी (हे पूर्वी चीनचे दीर्घकाळ परराष्ट्रमंत्री होते आणि अलीकडेच चिन गांग यांच्या हकालपट्टीनंतर पुन्हा त्या जबाबदारीवर नियुक्त झाले) यांनी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा