ऐ अहले-सियासत ये कदम रुक नहीं सकते

रुक सकते हैं फनकार कलम रुक नहीं सकते..

star pravah parivaar puraskar ceremony 2025
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
Ashok Saraf
“नशीब काढलंय मी…”, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सहकलाकाराची खास पोस्ट; म्हणाली…
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
Padma Awards 2025 R Ashwin Honoured with Padma Shri Padma Bhushan for PR Sreejesh
Padma Awards 2025: आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार, पीआर श्रीजेशला पद्मविभूषण जाहीर; पाहा संपूर्ण भारतीय खेळाडूंची यादी
Absconding accused Krishna Andhale declared wanted
Krishna Andhale : संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित! माहिती देणाऱ्यास मिळणार बक्षीस
recruitment of professors loksatta
विश्लेषण : प्राध्यापक भरतीचे होणार काय?

अशा काहीशा बंडखोर वळणानेच आयुष्यभर होत राहिला मुनव्वर राणांच्या शायरीचा प्रवास. प्रेमाची ‘शमा’ सजवून मैफिलीत वाचलेले विरहाचे कशिदे म्हणजे शायरी, ही उर्दू शायरीची व्याख्या मान्य नव्हती राणांना. म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच वेगळी वाट निवडली. शायरीपासून अस्पर्शित असलेले विषय उदा. आईची माया, बहिणीचे प्रेम, समाजासमोर उभा राहिलेला वैचारिक दुभंग, धर्माचे अवास्तव स्तोम, फाळणीचे दु:ख यांना राणांनी आपल्या शब्दांचा आधार दिला, त्यांना उर्दू शायरीच्या दुनियेत सर्वमान्यता मिळवून दिली. दुरूनच लक्ष वेधून घेणारा काळा सदरा, काळया सुरमाने सजलेले काळेभोर डोळे, बंगाली विडयाने रंगलेले ओठ आणि त्या ओठांवर थेट हदयातून अवतरणारी शायरी आता यापुढे अनुभवता येणार नाही. कारण, राणा आता गेलेत. ७१ वर्षांच्या शब्दमहोत्सवाची अखेर सांगता झाली. पण, मुनव्वर राणांच्या वादळी आयुष्याचे किस्से इतक्यात विसरले जाणे शक्य नाही. याचे कारण, जशी त्यांची शायरी आहे तशीच त्यांनी वेगवेगळया प्रसंगी घेतलेली राजकीय भूमिकाही आहे.

हेही वाचा >>> आसा नही था ‘मुनव्वर’ होना…!

मुनव्वर राणा आणि वाद यांचे गहिरे नाते होते. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होण्याआधी राणा म्हणाले होते की, योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेशात राहणार नाही, त्यांच्या या वक्तव्याने मोठे वादळ उठले. त्यांच्या राष्ट्रीयतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. उर्दू साहित्यातल्या अमूल्य योगदानासाठी २०१४ मध्ये राणा यांना त्यांच्या ‘शाहदाबा’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच २०१२ मध्ये त्यांना ‘माटी रतन सन्मान’ प्रदान करण्यात आला.

परंतु, २०१५ मध्ये त्यांनी देशातल्या असहिष्णुतेचा मुद्दा मांडला. उत्तर प्रदेशच्या दादरी येथे अखलाकचा झुंडबळी गेल्यानंतर, राणा यांनी एका वृत्तवाहिनीवरील थेट चर्चेदरम्यान त्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. देशातील वाढती असहिष्णुता हे त्यांनी या निर्णयामागचे कारण सांगितले होते.

हेही वाचा >>> प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन, बंडखोर कवी काळाच्या पडद्याआड

एवढंच नाही तर यानंतर आपण कुठलाही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, अशीही प्रतिज्ञा त्यांनी घेतली आणि ती आयुष्यभर जपली. शेवटच्या दिवसात राणांना अनेक गंभीर आजारांनी घेरले होते. परंतु, त्यांना त्या आजारांपेक्षा त्यांच्या स्वकीयांनी कौटुंबिक संपत्तीसाठी जो त्रास दिला त्याचे दु:ख जास्त होते. या दु:खातून ते अखेपर्यंत सावरलेच नाहीत आणि अखेर काल त्यांनी या जगाचा निरोप घेतला. असा निरोप अटळ आहे, हे राणांना ठाऊक होते म्हणून त्यांनी स्वत:च्या मृत्यूबाबत लिहून ठेवले होते..

‘हम से मोहब्बत करने वाले रोते ही रह जाएंगे

हम जो किसी दिन सोए तो सोते ही रह जाएंगे..’

Story img Loader