ऐ अहले-सियासत ये कदम रुक नहीं सकते

रुक सकते हैं फनकार कलम रुक नहीं सकते..

sharad pawar marathi news
‘कोरेगाव भीमा’प्रकरणी गोष्टी वदविण्याचा प्रयत्न, कोणत्या राजकीय नेत्याने केला हा आरोप !
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ajit pawar nitin gadkari ladki bahin yojana statement
“…तर आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच केली नसती”; नितीन गडकरींच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
farmers create chaos in krishi awards ceremony
कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात गोंधळ; फेटे उडवून शेतकऱ्यांकडून निषेध
praful patel on raj thackeray ladki bahin statement
राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “ज्या लोकांना सरकारची…”
Akshays parents went to Ambernath Municipality for burial permission their application was not accepted
अक्षय शिंदेचे प्रकरण सत्ताधारी पुरस्कृत, मृत अक्षयच्या वकिलांचा आरोप
jayant patil appeal bachchu kadu
Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…

अशा काहीशा बंडखोर वळणानेच आयुष्यभर होत राहिला मुनव्वर राणांच्या शायरीचा प्रवास. प्रेमाची ‘शमा’ सजवून मैफिलीत वाचलेले विरहाचे कशिदे म्हणजे शायरी, ही उर्दू शायरीची व्याख्या मान्य नव्हती राणांना. म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच वेगळी वाट निवडली. शायरीपासून अस्पर्शित असलेले विषय उदा. आईची माया, बहिणीचे प्रेम, समाजासमोर उभा राहिलेला वैचारिक दुभंग, धर्माचे अवास्तव स्तोम, फाळणीचे दु:ख यांना राणांनी आपल्या शब्दांचा आधार दिला, त्यांना उर्दू शायरीच्या दुनियेत सर्वमान्यता मिळवून दिली. दुरूनच लक्ष वेधून घेणारा काळा सदरा, काळया सुरमाने सजलेले काळेभोर डोळे, बंगाली विडयाने रंगलेले ओठ आणि त्या ओठांवर थेट हदयातून अवतरणारी शायरी आता यापुढे अनुभवता येणार नाही. कारण, राणा आता गेलेत. ७१ वर्षांच्या शब्दमहोत्सवाची अखेर सांगता झाली. पण, मुनव्वर राणांच्या वादळी आयुष्याचे किस्से इतक्यात विसरले जाणे शक्य नाही. याचे कारण, जशी त्यांची शायरी आहे तशीच त्यांनी वेगवेगळया प्रसंगी घेतलेली राजकीय भूमिकाही आहे.

हेही वाचा >>> आसा नही था ‘मुनव्वर’ होना…!

मुनव्वर राणा आणि वाद यांचे गहिरे नाते होते. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होण्याआधी राणा म्हणाले होते की, योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेशात राहणार नाही, त्यांच्या या वक्तव्याने मोठे वादळ उठले. त्यांच्या राष्ट्रीयतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. उर्दू साहित्यातल्या अमूल्य योगदानासाठी २०१४ मध्ये राणा यांना त्यांच्या ‘शाहदाबा’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच २०१२ मध्ये त्यांना ‘माटी रतन सन्मान’ प्रदान करण्यात आला.

परंतु, २०१५ मध्ये त्यांनी देशातल्या असहिष्णुतेचा मुद्दा मांडला. उत्तर प्रदेशच्या दादरी येथे अखलाकचा झुंडबळी गेल्यानंतर, राणा यांनी एका वृत्तवाहिनीवरील थेट चर्चेदरम्यान त्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. देशातील वाढती असहिष्णुता हे त्यांनी या निर्णयामागचे कारण सांगितले होते.

हेही वाचा >>> प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन, बंडखोर कवी काळाच्या पडद्याआड

एवढंच नाही तर यानंतर आपण कुठलाही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, अशीही प्रतिज्ञा त्यांनी घेतली आणि ती आयुष्यभर जपली. शेवटच्या दिवसात राणांना अनेक गंभीर आजारांनी घेरले होते. परंतु, त्यांना त्या आजारांपेक्षा त्यांच्या स्वकीयांनी कौटुंबिक संपत्तीसाठी जो त्रास दिला त्याचे दु:ख जास्त होते. या दु:खातून ते अखेपर्यंत सावरलेच नाहीत आणि अखेर काल त्यांनी या जगाचा निरोप घेतला. असा निरोप अटळ आहे, हे राणांना ठाऊक होते म्हणून त्यांनी स्वत:च्या मृत्यूबाबत लिहून ठेवले होते..

‘हम से मोहब्बत करने वाले रोते ही रह जाएंगे

हम जो किसी दिन सोए तो सोते ही रह जाएंगे..’