आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ऐन मोक्याच्या वेळी तुरुंगातून बाहेर आले आहेत. हरियाणामधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना केजरीवाल यांची सुटका झाली असल्यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. ‘आप’ म्हणजे केजरीवाल हेच समीकरण गेल्या काही वर्षांत रूढ झालेले आहे. त्यामुळे केजरीवाल नसतील तर ‘आप’ निवडणूक तरी कशी लढवणार असे बोलले जात होते. लोकसभा निवडणुकीवेळीही केजरीवाल तुरुंगात होते, त्यांना हंगामी जामीन मिळाला हा भाग वेगळा. पण ते दिल्लीतील प्रचारासाठी उपलब्ध झाले नसते तर ‘आप’साठी प्रचार कोणी केला असता असा प्रश्न तेव्हाही विचारला गेला होता. त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना हंगामी जामीन दिला, त्यांनी धूमधडाक्यात प्रचारही केला. ‘आप’ व काँग्रेस यांच्या आघाडीला तेव्हा दिल्लीत यश मिळाले नाही. पण केजरीवालांच्या झंझावाती प्रचारामुळे त्यांचे पक्षातील आणि ‘इंडिया’ आघाडीतील महत्त्व वाढले असे म्हणता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा