इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. हा विजय उल्लेखनीय आहे. भारतीय संघाचा आपल्याच भूमीवर हा सलग सतरावा विजय. २०१२मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने सातत्याने विजय मिळवलेला आहे. घरच्या मैदानांवर जिंकण्यात कोणती मर्दुमकी हा प्रश्न फ्रँचायझी क्रिकेटच्या वाढत्या विस्तारानंतर कालबाह्य ठरू लागला आहे. कारण ‘परदेशी वातावरण’, ‘अनोळखी खेळपट्ट्या’ हे संदर्भच आता पुसले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अलीकडच्या मालिकांवर नजर टाकल्यास एक बाब स्पष्ट होते. ती म्हणजे, घरच्या मैदानांवर मालिका ही आता विजयाची हमी ठरू शकत नाही. तशात इंग्लंडच्या संघाने प्रशिक्षक ब्रेंडन मॅककलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्या नेतृत्वाखाली इंग्लिश क्रिकेट संघ ‘बॅझबॉल’ या अत्यंत आक्रमक शैलीत खेळू लागला आहे. या शैलीशी जुळवून घेणे भल्याभल्या संघांना जड जाते. परंतु रोहित शर्माचे नेतृत्व आणि अनुभवी खेळाडूंना उदयोन्मुख खेळाडूंकडून मिळालेली साथ यांच्या जोरावर पहिला कसोटी सामना धक्कादायकरीत्या गमावूनही भारताने इंग्लंडवर बाजी उलटवली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा