‘शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान’चे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आणि आठ आठवडय़ांत नवे मंडळ स्थापन करण्याची सूचना केली. राज्यात सत्ताबदल झाल्यावर नवे सरकार आपल्या समर्थकांची वर्णी लावणार हा पुढील बदल असेल. विश्वस्त मंडळावरील सदस्यांच्या नियुक्तीबाबत न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषांनुसार महाविकास आघाडी सरकारने नियुक्त्या केल्या नव्हत्या हा मुख्य आक्षेप होता. वैद्यकीय, लेखापरीक्षण, वित्तीय आदी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची नियुक्ती केली नव्हती हा आक्षेप न्यायालयाने ग्राह्य धरला. शिंदे-फडणवीस सरकार नव्या नियुक्त्या करताना हे निकष पूर्ण करेल ही अपेक्षा. मुळातच देवस्थानांवर सरकारी नियंत्रण असावे का, हाच मूळ वादाचा मुद्दा आहे. देवस्थानांवर नियंत्रण असावे, असा राज्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. मग महाराष्ट्रापासून कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, उत्तराखंड असो सर्वच राज्यांमध्ये हे वाद निर्माण झालेले बघायला मिळतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा