गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारच्या वतीने रा. रं. बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी आली. लेखकाचा ‘समयोचित’ गौरव करण्याच्या बाबतीत समाज म्हणून आपण नेमके कुठे आहोत याचा या निमित्ताने खरे तर सर्वच संबंधितांनी विचार करायला हवा. नेटाने शिकताना पुस्तके वाचून, त्यातही व्यंकटेश माडगूळकरांची ‘माणदेशी माणसं’ आणि ‘गावाकडच्या गोष्टी’ ही पुस्तके वाचल्याने त्यांच्यात लिहिण्याची आवड निर्माण झाली. मॅट्रिकला असताना लिहिलेल्या ‘वसुली’ या कथेला शालेय विद्यार्थ्यांच्या लेखन स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले आणि त्यानंतर बोराडे लिहीतच राहिले. त्यांच्या लेखनाचा परिसर ग्रामीण असला तरीही आशय आणि विषयांत कमालीचे वैविध्य होते. त्याचबरोबर नवनव्या स्थित्यंतराच्या नोंदी ते आपल्या कथात्म साहित्यातून घेत राहिले. ग्रामीण समाजातील नात्यागोत्यांचे संबंध, त्यातले ताणतणाव यातून त्यांचा ‘नातीगोती’ हा कथासंग्रह साकारला. ‘बोळवण’सारख्या कथासंग्रहातून ग्रामीण स्त्रियांच्या दु:खाचा तळठाव शोधण्याचे काम त्यांनी केले. बोराडे हे बाल मनोविश्वाचाही समर्थपणे वेध घेतात हे त्यांच्या ‘खेळ’, ‘अभ्यास’, ‘कोकरू’, ‘भेग’ या कथांमधून दिसून येते तर ‘पाणी’, ‘मेंदी’, ‘कोंडण’ यांसारख्या कथा दलित जीवनालाही स्पर्श करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा