स्वामी केवलानंद सरस्वती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे गुरू. धर्मसंबंधी त्यांची धारणा पुरोगामी होती. धर्म म्हणजे वेगवेगळ्या संदर्भात काय करावे आणि काय करू नये, हे सांगणारे नियम. धर्माबाबतचा प्राथमिक दृष्टिकोन हा धर्मग्रंथाच्या शब्दप्रामाण्यावर अवलंबून होता. ही धर्मासंबंधीची रूढ, सनातन भूमिका होती. भारतात ब्रिटिश राज्यसत्तेची स्थापना पहिल्या स्वातंत्र्यलढ्यानंतर (१८५७) झाली. या स्थापनेनंतर भारतात ब्रिटिश कायद्यांचा अंमल सुरू झाला, त्यामुळे देशात शिक्षण प्रसाराच्या बरोबरीने समाज आणि धर्मसुधारणांना गती आली. १९२३ मध्ये वाई (जि. सातारा)मधील एका ब्राह्मण परिषदेत ब्राह्मण पोटजातींतील विवाह धर्मसंमत मानावेत, अशी पुरोगामी भूमिका स्वामी केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी हिरिरीने मांडली. त्याचा अनुकूल परिणाम समाजमनावर पडल्याचे दिसून आले. त्यातून सुधारणावादी धर्मविचारांची गरज अधोरेखित झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा