राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘दरवर्षी गणेशोत्सव येतो. त्यानिमित्ताने माणूस आपल्या अंगातील उत्साहाला वाव देत असतो. हा उत्साह चांगल्या प्रकारे प्रकट झाला पाहिजे. आज तसे म्हणता येणार नाही. कोणातरी बुवाला, साधूला बोलावून कार्यक्रम साजरा करणे किंवा नाच तमाशे करून लोकांचे मनोरंजन करणे एवढेच आजच्या गणपती उत्सवाचे स्वरूप आहे, ही वस्तुस्थिती तरुणांना भूषणावह नाही. त्यात तरुणांच्या शक्तीचा कोणत्याही प्रकारे विकास होत नाही. असला तर त्यात त्या शक्तीचा दुरुपयोगच आहे. वास्तविक गणेशोत्सव हा राष्ट्रीय उत्सव आहे. त्यामागे एक जिवंत परंपरा आहे. गणपती उत्सवामुळे राष्ट्रात तेज निर्माण व्हावे, जनतेत चैतन्य निर्माण व्हावे, तरुणांचा उत्साह राष्ट्राच्या कारणी लागावा असा या उत्सवाच्या परंपरेमागे हेतू आहे. परंतु या उत्सवाच्या निमित्ताने देशातले हजारो रुपये खर्ची पडतात. त्या पैशांचा राष्ट्राला, समाजाला, काही उपयोग होणार नसेल तर ते सारे व्यर्थ गेले असे मानणारा मी माणूस आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा