‘आवडतो मज कण-कण इथला, न सुटे प्रेम मनाचे- मज वेडची गुरुकुंजाचे’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनातून त्यांचे गुरुकुंज आश्रमाविषयीचे प्रेम लक्षात येते. सामुदायिक प्रार्थना व ध्यान या उपासना पद्धती महाराजांनी सुरू केल्या. महाराज म्हणतात, ‘‘चोवीसही तास या उपासनेतच घालवावे असा आग्रह नाही. आसपासच्या गावांतील लोक रोज गुरुकुंजात येऊ शकणार नाहीत; मात्र मोझरी आणि गुरुदेव नगरवासीयांनी ध्यान-प्रार्थनेला तरी जरूर यावे आणि शक्य झाले तर येथे अध्ययनसुद्धा करावे. यातून जे सुविचार पुढे येतील ते त्यांनी इतरांनाही दिले पाहिजेत. हे भगवंताचे विधानच आहे, की जो काही देतो त्यालाच घेण्याचा हक्क मिळतो आणि जो काही घेतो त्याचे देणे हेच कर्तव्य ठरते. आश्रमापासून तुम्ही काही घ्या आणि तुमच्याकडूनही आश्रमाला काही सहकार्य द्या; जे तुम्ही आश्रमात प्राप्त कराल ते इतरांनाही शिकवा; यातच सर्वाचे कल्याण आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा