‘चमत्कार तेथे नमस्कार, तेणे जादूगिरीस चढे पूर।’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत चमत्काराबाबत परखड भाष्य केले. महाराज म्हणतात, ‘‘या देशातील अनेक सिद्ध लोकांनी आणि अनेक चमत्कार करून दाखवणाऱ्या ‘सिद्धप्रसन्न’ लोकांनी या देशावर काय उपकार करून ठेवला, ही गोष्ट समजणे प्रत्येकाच्या विचारधारणेवर अवलंबून आहे. बुवांनी मेलेली माणसे जिवंत केली असेही ऐकिवात आहे. परंतु त्यांची अफाट शक्ती एखादाच माणूस जिवंत करण्याइतकी कशी आकुंचित राहू शकली व त्यांच्या घरातील माणसांनाही कसे त्यांनी कायमचे ठेवलेले नाही, याबद्दल मनात नेहमी शंका असते. कोणी म्हणतील की, जिवंत झालेल्या माणसाचे भाग्य होते. मग मेलेला माणूस आपल्या भाग्याने जिवंत झाला असेल तर? ‘कितीही विषारी साप आमच्यापुढे नम्र होऊ शकतो’, असे दावे करणाऱ्यांचाही मृत्यू सर्पदंशानेच झाल्याचीही उदाहरणे आहेत. तेव्हा हा चमत्कार नसून एक विशिष्ट कला आहे अथवा विद्या आहे, असे का म्हणू नये?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा