‘‘सत्ता की आयु न बडमी, सेवा की ध्वज सदा खडमी’’ असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘जाणते लोक मागासलेल्या जनतेची सेवा व उन्नती करण्याऐवजी फुकटची मानप्रतिष्ठा मिळविण्यासाठीच धडपड व ओढाताण करू लागले, तर त्यांचे ते महापाप राष्ट्राला अधोगतीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. मस्तवाल हत्ती आपसात खूप झुंजतात, पण त्यामुळे झाडाझुडपांचा नि गरीब जीवांचा चुराडा होतो; याला जबाबदार कोण? वास्तविक दोघांनीही एक व्हावे- स्वार्थासाठी नव्हे तर सेवेसाठी- यातच सर्वाचे कल्याण आहे.’’

‘‘सत्ताधारी पक्ष, जनतेतील अनेक लहानथोर पक्ष यांनी एकाच दिशेने राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात शक्ती खर्ची घातली तर ते कार्य करू शकणार नाहीत का? राष्ट्रोन्नतीच्या शेकडो गोष्टी आपणा सर्वाची वाट पाहात आहेत. मग आपसात अशी चढाओढ करण्यात शहाणपण कसले? तुम्हाला समाजाचे खरे नेतृत्वच हवे असेल, तर त्यासाठी सत्तेची लालसा सोडून सेवेचाच मार्ग चोखाळणे उत्तम. सत्ता आणि सेवा यांचे सत्याच्या अधिष्ठानावर ऐक्य घडवून आणण्यातच आज सर्वाचे हित आहे. सामान्य जनांचे प्रामाणिक सेवक होऊन त्यांच्या हृदयसिंहासनावर गौरवाने विराजमान व्हावे!’’

Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
Best Speech Award by President Draupadi Murmu
महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आवाहन; विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात मार्गदर्शन
foreign Minister S Jaishankar
भारताच्या दृष्टीने चीन ही विशेष समस्या! परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे मत
regional discrimination, textile industry policy,
सांगली : वस्त्रोद्योग धोरणात प्रादेशिक भेदभावाचा आरोप, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय – किरण तारळेकर
Prime Minister Narendra Modi statement on Jan Dhan Yojana
‘जन धन’ योजना राष्ट्रनिर्माणात सहभागाच्या संधीचे प्रतीक -पंतप्रधान
Anil Deshmukh, Shakti Act,
महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायद्याला केंद्रामुळे विलंब? माजी गृहमंत्र्यांनी थेटच…

‘‘आज घराघरांत गटतट पडले आहेत; एकेका संस्थेत अनेक गटतट आहेत. प्रत्येक पुढारी राजासारखा डामडौलाने नांदू पाहात आहे. अनेक जण जनतेची तोंडदेखली कळकळ दाखवितात, मात्र निरपराध जनतेला जे कष्ट सोसावे लागत आहेत, त्यांच्या निवारणासाठी कोणीही पुढे पाऊल टाकण्यास तयार नसते. जो तो पुढारी बनून सिंहासनावर बसण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी कृष्णकारस्थाने, इलेक्शनबाजी, मारामाऱ्या करण्यापर्यंत मजल गेलेली आहे. वास्तविक हा मार्ग अत्यंत धोक्याचा असून, राष्ट्रात अशीच यादवी वाढत गेल्यास त्याचा परिणाम सर्वाच्या शक्तियुक्तीचा व जीवनसुखाचा परस्परांकडून नाश होण्यातच होणार, हे उघड आहे.’’

‘‘एकेक तालुका, जिल्हा किंवा गाव घेऊन, त्यालाच आपले कार्यक्षेत्र बनवून, तेथे रामराज्याची कल्पना आपल्या विधायक कार्यक्रमांनी प्रत्यक्षात आणून दाखवा; म्हणजे काही ओढाताण न करताही तुम्ही सहजच जनतेचे खरेखुरे पुढारी व्हाल. बनवाबनवी न करताही लोक तुम्हाला आपले नेते ठरवून सन्मान देतील. तुमचे सेवेने प्राप्त झालेले पुढारीपण हिरावून घेण्याची ताकद सत्तेच्या अंगीदेखील राहणार नाही. झगडा सत्तेचा असतो, सेवेचा असूच शकत नाही. सत्तेसाठी तुम्ही कितीही धडपडलात तरी तो मार्ग शाश्वत आणि निर्वेध नाही; पण सेवेने तुम्ही पुढे आलात तर तुमचे श्रेष्ठत्व कायम राहणार आहे. ते काढून घेण्यासाठी दुसऱ्याला तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ सेवाच करावी लागेल आणि अशा सन्मार्गात उत्पन्न झालेल्या स्पर्धेतून राष्ट्राचे कल्याणच होईल. जाणते लोक मागासलेल्या लोकांची उन्नती करण्याची आपली जबाबदारी विसरून त्यांच्या जिवावर चैन करण्याच्या मागे लागत आले, हेच पाप आज भारताला पदोपदी नडत आहे.

राजेश बोबडे