‘‘राष्ट्राच्या उत्थानाला देशातील नि:स्पृह, चारित्र्यवान व धैर्यशील लोकच कारणीभूत होत असतात. राष्ट्राचे राष्ट्रीयत्व अशा लोकांनी केलेल्या प्रचारातच असते; अर्थात हेच लोक समाजात राष्ट्रीय भावना टिकवून ठेवीत असतात. राष्ट्रात विरक्त वृत्तीने पण लोकहिताच्या कळकळीने सत्य ज्ञानाचा व जीवनविषयक निर्भेळ दृष्टिकोनाचा प्रचार करणारे प्रचारक जोवर कर्तव्यतत्पर असतात तोवरच त्या राष्ट्राची इज्जत कायम असते’’ – हे सांगतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इशाराही देतात : ज्या दिवशी व्यक्तिगत सुखाच्या प्रलोभनात गुंतून किंवा सेवेची भावना शिथिल पडून हे नि:स्पृह प्रचारक आपले काम सोडून दुसऱ्या मार्गाला लागतात, त्या दिवसापासून राष्ट्र हे नकळत धुळीस मिळत जाते. म्हणूनच विरक्त व सुबुद्ध प्रचारकांची उज्ज्वल परंपरा राष्ट्रात अखंड जिवंत व जागृत असली पाहिजे. कारण, प्रचारक हेच ‘राष्ट्राची खरी स्मृती’ आहेत आणि ही स्मृतीच बिघडली तर ‘स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धीनाशात् प्रणश्यति’ याप्रमाणे राष्ट्राचा बुद्धिनाश होऊन त्याचा सर्वस्वी आत्मनाश होणे स्वाभाविक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा