कोणत्याही उत्सवाचा सामान्यांना जाच होऊ नये. मग तो कोणत्याही धार्मिक सणांचा असो की ‘लोकशाहीचा उत्सव’ म्हणवल्या जाणाऱ्या निवडणुकांचा. सार्वजनिक पातळीवर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात जनतेची कमीत कमी गैरसोय कशी होईल अथवा होणार नाही हे बघणे विविध प्रशासकीय यंत्रणांचे काम. ते त्यांनी चोखपणे पार पाडण्यात कुणाची हरकत असण्याचे काही कारण नाही. अलीकडे मात्र या कामगिरीचा अतिरेक होऊ लागल्याची शंका वारंवार येऊ लागली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या उत्सवात मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा व ‘रोड शो’च्या निमित्ताने रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचे प्रकार कमालीचे वाढले. सुरक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या श्रेणीत येणाऱ्या नेत्याचा संबोधन कार्यक्रम असला की सामान्यांचे हाल ठरलेले आहेत. मग ते मुंबई, पुणे, नागपूर असो वा चंद्रपूर. परिस्थिती सर्वत्र सारखीच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा