‘राज्यकर्ते आम्हीच’, अशी शेखी मिरवणाऱ्या काँग्रेसला अकरा वर्षांपूर्वी भाजपने जबरदस्त दणका दिला होता. भाजपने आपल्या हातून केंद्रातील सत्ता हिसकावून घेतली कशी, हे तेव्हा काँग्रेसला कळले नव्हते. भाजपच्या विजयामागे अनेक गोष्टी होत्या, त्याचा उलगडा भाजपने २०१९ची लोकसभा जिंकल्यानंतर होऊ लागला. पण, तोपर्यंत भाजपने देशाच्या प्रशासकीय व्यवस्थांवर पूर्ण पकड मिळवलेली होती. भाजपचा हा अंकुश अनेकांची झोप उडवणारा होता. म्हणून तर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये गेल्यावर, ‘आता मला शांत झोप लागते’, असे म्हणू लागले होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना भाजपची विचारसरणी पसंत होती वा भाजपची कार्यपद्धती मान्य होती असे नव्हे. पण त्यांचा नाइलाज होता. त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अन्यथा तुरुंगाची हवा खाण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर होती. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे येऊन हात जोडून, ‘मला जाऊ द्या’, असे म्हणणारे नेतेही या पाच वर्षांत दिसले. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ या दोन तपास यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता काँग्रेस नेत्यांच्या छातीत धडकी भरवणारी होती. कधी दरवाजावर ठकठक होईल आणि आपली रवानगी कोठडीत होईल याची भीती त्यांच्या मनात घर करून राहिली होती. काँग्रेसच्या पराभवांना अनेक कारणे असतील; पण काँग्रेस नेत्यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा प्रमुख कारणांपैकी एक मानता येईल. हा मुद्दा इथे मांडण्याचे कारण असे की, काँग्रेसच्या संघटनात्मक बदलांमध्ये हा मुद्दा केंद्रीभूत झाला असल्याचे दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा