महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघाच्या वतीने अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या राज्य कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने वादाचा आणखी एक आखाडा पार पडला. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळच्या रूपाने नवा ‘महाराष्ट्र केसरी’ गवसला. पण, या वेळी त्याच्या विजेतेपदाला लागलेली वादाची किनार विसरता येणार नाही. किताब जिंकल्यानंतरही चर्चा पृथ्वीराजच्या विजयाची, त्याच्या कौशल्याची वा मेहनतीची नाही, तर त्याच्याविरुद्ध गादी विभागात अंतिम लढतीत चितपट झालेल्या शिवराज राक्षेची आणि त्याने केलेल्या कृतीची अधिक झाली. किताबी लढतीला तीन दिवस झाले, तरी ही चर्चा थांबायचे नाव घेत नाही. राष्ट्रीय पातळीवर बृजभूषण शरण सिंह यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांच्या विरोधात साक्षी मलिक, विनेश फोगट या अव्वल महिला कुस्तीपटूंनी दिलेला लढा या पार्श्वभूमीवर, ‘महाराष्ट्र केसरी’ लढतीच्या निमित्ताने होणारी ही खडाखडी भारतातील कुस्ती नेमकी कुठे चालली आहे, असा प्रश्न उपस्थित करणारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा