धर्म नाही असा एकही मानवी समाज जगात नाही, असे सांगत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी धर्म सार्वत्रिक, वैश्विक असल्याचे स्पष्ट केले आहे. जगातील प्रत्येक धर्माची स्वत:ची ओळख आराध्य आणि आराधना पद्धती यावर ठरत आली आहे. यातील वैविध्यानेच एक धर्म दुसऱ्या धर्मापासून वेगळा ठरतो. यापूर्वी तर्कतीर्थांनी विविध धर्मसभा, परिषदा आणि संमेलनांमधून वाद-प्रतिवाद केले, ते दुसरे-तिसरे काही नसून तो परंपरा आणि परिवर्तनाचा संघर्ष होता, असे म्हटले पाहिजे. अशा सभा-संमेलनांमधून धर्मनिर्णय केले जातात ते त्या धर्मप्रमुखाच्या निर्णयानुसार. धर्माचे पारंपरिक स्वरूप टिकवून ठेवणे हे धर्मप्रमुखाचे आद्या कर्तव्य असते. ती त्याची जबाबदारीही असते. समाजात स्वतंत्र विचार करणारा एक वर्ग असतो. तो कालसंगत परिवर्तनाचा समर्थक असतो. जे धर्मपंडित, पुरोहित असतात, ते धर्माचे पुरातन स्वरूप प्रमाण मानून धर्म अपरिवर्तनीय असल्याचे सांगत राहतात. त्याचे आधार अर्थातच धर्मग्रंथ असतात. धर्मग्रंथांचे शब्दप्रामाण्य धर्मपंडित शिरोधार्य मानत असल्याने नवमतवादी धर्मसुधारकांचा ते विरोध करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा